

पणजी: गोव्याच्या किनारपट्टीबाबत केंद्र सरकारने दिलेल्या नव्या माहितीनुसार राज्याची किनारपट्टी अधिकृतरीत्या ३३ किलोमीटरने वाढली आहे. केंद्रातील विविध यंत्रणांनी केलेल्या नव्या मोजणीप्रमाणे गोव्याची किनारपट्टी आता एकूण १९३ किलोमीटर इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सत्तरच्या दशकात नोंद असलेली लांबी १६० किमी होती.राज्यसभेत ही अद्ययावत माहिती सादर करताना पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, नव्या मोजणीमुळे भावी किनारी नियोजन, पायाभूत सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या धोरणांमध्ये अचूकता येणार आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर हा डेटा विशेष महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
गोव्याच्या दृष्टीने वाढलेली किनारपट्टी दीर्घकालीन पायाभूत सुविधा, बंदर विकास, तसेच विशिष्ट पर्यटन पट्ट्यांची ओळख या सर्व क्षेत्रांत नवे मार्ग उघडत आहे. अधिकाऱ्यांच्या मते, नव्या सर्वेक्षणामुळे आर्थिक विकास आणि समुद्रकिनारी हवामान-तयारी या दोन्हीसाठी अधिक अचूक नियोजन करण्यास मदत होणार आहे.
या अहवालामुळे राज्यातील किनारी विकासाविषयी नवी चर्चा सुरू झाली असून, नव्याने निश्चित झालेली १९३ किमी किनारपट्टी भविष्यातील धोरणांना दिशादर्शक ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.