Midday Meal Scheme: काणकोणात दरवाढीमुळे 'माध्यान्ह' आहार बंद!

Goa Food: या योजनेचा फायदा घेणारे सुमारे दोन हजार शाळकरी मुले माध्यान्ह आहारापासून वंचित आहेत.
Goa Food | School Student
Goa Food | School StudentDainik Gomantak
Published on
Updated on

Canacona: महागाई वाढल्यामुळे माध्यान्ह आहाराचे दर परवडत नाहीत. त्यामुळे स्वंय साहाय्य गटांनी 1 ऑक्टोबरपासून शाळकरी मुलांचा मध्यान्ह आहार पुरविणे बंद केले आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा घेणारे सुमारे दोन हजार शाळकरी मुले (School Boy) मध्यान्ह आहारापासून वंचित आहेत.

2014 मध्ये राज्यातील मध्यान्ह आहार पुरविणाऱ्या स्वयं साहाय्य गटाच्या मागणी प्रमाणे दरात 2009 पेक्षा किंचित वाढ करण्यात आली होती. त्यावेळी पहिली ते चौथीच्या मुलांसाठी मध्यान्ह आहाराचे दर 6.11 रुपये व पाचवी ते आठवीसाठी 7.45 रुपये असा देण्यात येत होता. त्यावेळी मुलांना खिचडी, पुलाव, भाजी पाव हा मेनू होता. मात्र आता त्या मेनूत बदल करण्यात आला आहे.

Goa Food | School Student
Goa Crime News: वेर्णा बिर्ला जंक्शनवर गांजासह बिहारच्या तरुणाला अटक

सध्या कडधान्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे प्रचलित दरात मध्यान्ह आहार पुरविणे शक्य नाही. त्यासंबंधी शिक्षण खात्याला आगाऊ कळविण्यात आले आहे. विद्यार्थी किमान दहा रूपये व सहावी ते आठवी प्रति मुलांसाठी किमान दहा रुपये दर निश्चित करणे गरजेचे आहे. असे ओमकार स्वंय साहाय्य गटाच्या अध्यक्ष संध्या ऊर्फ स्नेहा देसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com