Goa Bajrang Dal : राज्यातील गायींची अवैध कत्तल थांबवा; बजरंग दलाची सरकारकडे मागणी

अवैध कत्तल होत असेल तर परवाने रद्द करा : बजरंग दल
Goa Bajrang Dal
Goa Bajrang DalDainik Gomantak
Published on
Updated on

Illegal Slaughtering Of Cows In Goa : गोव्यात गायींची बेकायदा कत्तल सुरू आहे. राज्यातील पोलीस प्रशासनाने या प्रकारावर लक्ष देवून अवैध कत्तल थांबवावी. कत्तल खान्यांच्या बाहेर जर अवैध कत्तल होत असेल तर कत्तल खान्यांना दिलेले परवाने रद्द करावेत अशी मागणी बजरंग दलाने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे केली आहे.

"सरकारने ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तल खान्यांच्या परिसरात कलम 144 लागू केला. डिचोली येथे ईदच्या पार्श्वभूमीवर डिचोली येथे एका एनजीओने मस्जीद मधून 25 गायींची सुटका केली. वेर्णा येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका संशयित कारला थांबवले. तसेच कोलवा येथे 5 गोवंशांमधील 4 गोवंशांना वाचविले" असे बजरंग दलाच्या गोवा विभागाचे सहसंयोजक विराज यांनी सांगितले.

कत्तल खान्यांमध्ये काल कत्तल झालीच नाही तर आज मांस कोठून आले असा सवालही त्यांनी केला. प्रशासनाने यावर लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com