Goa: मिरामार किनाऱ्‍यावर मोठ्या प्रमाणात तेल गोळे आल्याने किनारा काळवंडला

गणपती विसर्जनाला अडथळे, जैवविविधतेला धोका (Threat to biodiversity), निसर्गसुंदर किनारा तेल गोळ्यांनी कालवंडल्यामुळे मिरामार (Miramar) किनाऱ्यावर येणारे पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत. एवढेच नव्हे, तर काही पर्यटक किनाऱ्यापर्यंत जाण्याचेही टाळत आहेत.
किनाऱ्यावर येणाऱ्या तेल गोळ्यांसंबंधी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने भक्त संतप्त झाले आहेत.
किनाऱ्यावर येणाऱ्या तेल गोळ्यांसंबंधी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने भक्त संतप्त झाले आहेत.Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात गणेश उत्सवाचे उत्साही वातावरण असताना आणि दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होत असताना मिरामार (Miramar) किनाऱ्‍यावर मोठ्या प्रमाणात तेल गोळे (Oil balls) आल्याने गणेश भक्तांना यातून वाट काढत आज दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करावे लागले. वारंवार किनाऱ्यावर येणाऱ्या तेल गोळ्यांसंबंधी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने भक्त संतप्त झाले आहेत, तर दुसरीकडे यामुळे किनारपट्टीचे मोठ्या प्रमाणत नुकसान होत असून याचा किनापट्टीवरील  जैवविविधेलाही  धोका (Threat to biodiversity) निर्माण झाला आहे. 

किनाऱ्यावर येणाऱ्या तेल गोळ्यांसंबंधी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने भक्त संतप्त झाले आहेत.
Goa: 'गणपती बप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'

गोवा पर्यटन विकास महामंडळाने किनाऱ्याची स्वच्छता करणे गरजेचे असताना अक्षम्य दुर्लक्ष झालेल्या दिसत आहे. या तेल गोळ्यांमुळे गणपती विसर्जन करण्यासाठी आलेल्या भक्तांचे पाय घाण होत असून तेल आणि माती मिश्रित काळे गोळे संपूर्ण किनारपट्टीवर पसरत आहेत, तर दुसरीकडे पर्यटकांनाही याचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसत आहे. सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा आणि हे तेल गोळे त्वरित काढून किनारपट्टी स्वच्छ करावी अशी मागणी गणेश भक्तांकडून होत आहे.

किनाऱ्यावर येणाऱ्या तेल गोळ्यांसंबंधी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने भक्त संतप्त झाले आहेत.
Goa: गणेशभक्ताला मिळाली गणपती सदृश्य आकाराची पपई

पर्यटकांत नाराजी

मिरामार किनाऱ्यावर सर्वत्र तेल गोळे वाहून आल्याने पर्यटकांना या तेल गोळ्यांतून वाट काढत समुद्रकिनाऱ्याचा आनंद घ्यावा लागत आहे. किनाऱ्यावरून अथांग समुद्र नेहाळतानाच पायाखाली एकादा तेल गोळा तर नाही ना याची दक्षता घ्यावी लागत आहे. निसर्गसुंदर किनारा तेल गोळ्यांनी कालवंडल्यामुळे मिरामार किनाऱ्यावर येणारे पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत. एवढेच नव्हे, तर काही पर्यटक किनाऱ्यापर्यंत जाण्याचेही टाळत आहेत.

दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाचा दिवस असताना संपूर्ण मिरामार किनारपट्टीवर तेलाचे गोळे आल्याने आम्हाला गणपती विसर्जन करण्यासाठी यातूनच वाट काढावी लागत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने हे तेल गोळे काढून किनारपट्टी तातडीने स्वच्छ करावी.

- मंदार गावकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com