डिचोली : साळ गाव हा निसर्ग संपन्न आहे. गावात आल्हाददायक वातावरण असल्याने प्रदूषण होऊ नये, यासाठी नाल्यांची स्वच्छता वेळोवेळी होणे गरजेचे आहे. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच नाले गाळाने भरू नयेत यासाठी नाल्याची स्वच्छता करण्यात येत आहे. साळ नाल्याची स्वच्छता केल्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यात यणार असल्याची माहिती आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दिली.
साळ येथील गणीसकोण ते कोळम (बाळूक) यापर्यंतच्या नाल्याच्या स्वच्छता कार्यक्रमाला सुरवात केल्यानंतर ते बोलत होते. सुमारे पाच लाख रुपये खर्च करून नाल्याची स्वच्छता करण्यात येत आहे. यावेळी लाटंबार्सेचे जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, साळचे सरपंच घनश्याम राऊत, पंचसदस्य, श्री महादेव भूमिका देवस्थान मंडळाचे अध्यक्ष कालिदास राऊत, जल संसाधन खाते, डिचोली-मुळगावचे सहाय्यक अभियंता नरेश पोकळे, कनिष्ठ अभियंता विवेक परब, ठेकेदार पद्माकर मळीक आदी उपस्थित होते.
साळ येथे पावसाळ्यात जो पूर येतो त्याचे एक कारण म्हणजे येथील गणीसकोण ते कोळम हा नाला पूर्णता गाळाने भरला जातो. नाल्याकाठी झुडपे वाढली असून, मातीची धूप होऊन ही माती नाल्यात साचलेली आहे. त्यामुळे पाण्याने आपली दिशा बदलायला सुरवात केली आहे. पावसाळ्यात नाल्यातून वाहणारे पाणी शेत जमिनीतून येते. ही बाब शेतकऱ्यांनी शेट्ये यांच्या निदर्शनास आणून दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.