
फोंडा: पाचावाडा ते तिराळ मार्गावर मेहीतेंबी साकवाजवळ ओहोळ व शेत जमिनीतून संरक्षक भिंत उभारून स्वतःसाठी खासगी रस्ता बांधकाम करणाऱ्या गजेंद्र आर. उसगावकर यांना उसगाव पंचायतीने काम बंद ठेवण्याची नोटीस बजावली आहे. यासंदर्भात तिराळ उसगाव येथील रोहन रावजी नाईक यांनी पंचायत कार्यालयात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीत म्हटले होते की, पंचायतीकडून आवश्यक परवानगी न घेता गजेंद्र उसगावकर यांनी मेडीतेंबी येथे बेकायदा संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरु केले आहे. या भागात पुराची स्थिती निर्माण होत असल्याने हे धोकादायक आहे.
या तक्रारीची दखल पंचायतीने घेत उसगावकर यांना काम बंद ठेवण्याची नोटीस दिली. तसेच तीन दिवसांच्या आत नोटिशीला उत्तर देण्यास सांगितले आहे. अन्यथा पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा या नोटिशीतून दिलेला आहे.
भिंत उभारून रस्ता बांधकाम करताना ओहोळाच्या पाण्याचा मुख्य प्रवाह अडविण्यात आला आहे. यामुळे त्या भागात पावसाळ्यात पुराचा धोका वाढला आहे. गेल्या दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीत ओहोळ व शेतात पाणी साचून पाण्याची पातळी वाढू लागली आहे. पाणी ओहोळाच्या कठड्यापर्यंत येऊ लागले आहे, त्यामुळे लोक भयभीत झाले असल्याची माहिती रोहन नाईक यांनी दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.