...आता हवामान बदलामुळे फेणी उत्पादनावर होत आहे परिणाम

कमी काजू उत्पादनामुळे गोव्यातील फेणी उत्पादनावर परिणाम होताना दिसत आहे.
Kaju Feni
Kaju FeniDainik Gomantak

पणजी: कमी काजू उत्पादनामुळे गोव्यातील फेणी उत्पादनावर परिणाम होताना दिसत आहे. सहसा, फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत, डिस्टिलरीज आणि काजू उत्पादक सक्रिय होतात, तथापि, यावर्षी हंगामाला महिना उलटून गेला तरी, बहुतेकांनी काजू (Kaju Feni) सफरचंदांचे गाळप करण्यास सुरुवात केली नाही. (climate change is having an effect on feni production)

Kaju Feni
गोव्यातील शिगमो गीतांमधून पर्यावरणीय ज्ञानाचे धडे

मार्च महिना हा या उद्योगासाठी सीझन मानला जातो, परंतु हवामानातील बदलांमुळे फळधारणा खूपच कमी झाली आहे. हंगाम महिनाभराने लांबला आहे. मागील दोन हंगामात साथीच्या रोगामुळे (Covid Pandamic) फटका बसला. “गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे एक महिना उशीर झाला. मूलत: फुलांची निर्मिती नोव्हेंबरमध्ये व्हायला हवी होती, परंतु तसे झाले नाही. हवामान बदलाचा मोठा फटका बसत आहे.

” फेनी ब्रँड काझुलोचे संस्थापक, हॅन्सेल वाझ म्हणाले की, काजू पिकासह भात आणि आंबा पिकेही फसली आहेत. काजूच्या झाडांनाही फळधारणेला उशीर झाला आहे. हवामानातील बदल हा खरा आहे आणि आपण त्यास सामोरे जाणे आवश्यक आहे,

" हळदणकर लिकर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम हळदणकर म्हणाले की, हंगाम इतका खराब आहे की उत्तर गोव्यातील (Goa) अनेक गाळप अद्याप सुरू झालेले नाही. ते म्हणाले, "आम्ही डिस्टिलिंग सुरू केले आहे, परंतु उत्पादन पूर्वीपेक्षा खूपच कमी आहे,असे ते म्हणाले

Kaju Feni
बाणावलीत विद्युतभारित तारांमुळे धोका वाढला

ही एक विचित्र परिस्थिती असल्याचे वाझ यांनी सांगीतले,” ते म्हणाले की, या वर्षी त्यांना मोठ्या आशा होत्या कारण त्यांनी साथीच्या रोगाच्या दोन वर्षानंतर पूर्ण वाढीव डिस्टिलिंग सुरू केले होते, परंतु उशीरा फळे अल्याने याला फटका बसला. मार्च 2020 च्या अखेरीस राष्ट्रीय लॉक-डाऊनमुळे सर्व क्रियाकलाप निलंबित करण्यात आले होते, तर गेल्या वर्षी मार्चच्या मध्यात दुसरी लाट सुरू झाल्याने व्यापारावर परिणाम झाला होता. “आमच्याकडे पर्याय नाही. मी मोठ्या आशावादाने या हंगामाची वाट पाहत होतो कारण हे वर्ष महामारीच्या तीन लहरींनंतरचा पहिला योग्य हंगाम होता,” असे वाझ म्हणाले. अल्पभूधारक शेतकरी आणि डिस्टिलर्स ज्यांच्यासाठी काजू उत्पादन आणि डिस्टिलिंग हे उत्पन्नाचे साधन आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत त्रासदायक आहे. "काजू हे नगदी पीक आहे आणि हंगामात उशीर झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना (Goa Farmer) याचा फटका बसला आहे," ते पुढे म्हणाले. काजूचा हंगाम मे अखेरपर्यंत असतो. पुढचे दोन महिने फारसे उत्पादन मिळेल की नाही याची खात्री शेतकऱ्यांना नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com