खराब हवामानाचा गोव्यातील काजू पीक आणि किनारपट्टीवर परिणाम; पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली मोठी भीती

गोवा राज्य हवामान बदलाच्या कृती आराखड्यानुसार, पूर आणि इतर कारणांमुळे गोव्याची 15% जमीन नष्ट होईल.
Climate Change
Climate ChangeDainik Gomantak

Climate Change Impact On Cashew And Beach In Goa: खराब हवामानाचा परिणाम गोव्यातील काजू पिकावर झाला आहे. तसेच, गोव्याच्या किनारपट्टीला देखील धूप होण्याच्या धोका निर्माण झाला आहे.

हवामान बदलाचा परिणाम गोव्यात सहज दिसून येतोय, यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारने प्राधान्य द्यावे, अन्यथा राज्याचे आर्थिक नुकसान होईल, असे मत पर्यावरणवादी अभिजित प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले आहे.

गोवा राज्य हवामान बदलाच्या कृती आराखड्यानुसार, पूर आणि इतर कारणांमुळे गोव्याची 15% जमीन नष्ट होईल. गोव्याने जमीन गमावली तर त्याचा पर्यटनावरही परिणाम होईल, कारण समुद्रकिनारे पाण्यात जातील. ज्या पर्यटन क्षेत्रांवर आपली अर्थव्यवस्था अवलंबून आहे ते आपण गमावू, असेही प्रभुदेसाई म्हणाले.

अर्थव्यवस्था कोलमडली तर आपण काय करणार? 15 टक्के जमीन गमावल्यास किनारपट्टीच्या राज्याचे मोठे नुकसान होईल. समुद्र पातळी वाढल्याने किनारपट्टीची धूप होईल. संपूर्ण किनारी भाग प्रभावित होईल.

हवामान बदलाचा कृषी क्षेत्रावर देखील परिणाम होत आहे, त्यामुळे सरकारने अर्थसंकल्पात जास्तीत जास्त तरतुदी करून हे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे. भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण न केल्यास पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागू शकते.

हवामान बदलाचा परिणाम फळांच्या पॅटर्नवरही झाला असल्याचे त्यांनी सांगितले. हवामानातील बदलामुळे काजू उत्पादन आणि इतर कामांवर परिणाम झाल्याचे अनेक शेतकरी सांगतात. हवामान अनुकूल नसल्याने मासे प्रजननासाठी इतर ठिकाणी जात असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे, असे प्रभुदेसाई म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com