
पणजी: इयत्ता पाचवी आणि आठवीच्या क्षमता तपासणी परीक्षा सध्या होणार नाहीत. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना एनसीईआरटीद्वारे आल्यानंतर परीक्षा आयोजित केल्या जातील, असे राज्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी दै. ‘गोमन्तक’चे संपादक - संचालक राजू नायक यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
लोलयेकर म्हणाले, पाचवी आणि आठवीसाठी हा क्षमता तपासणी परीक्षा निर्णय तात्काळ लागू नाही. २०२७ पर्यंत राज्यात सर्व शैक्षणिक स्तरावर नवीन शिक्षण धोरण लागू होईल, परंतु त्यानंतर जरी काही बदल करावे लागले, सुधारणा करायच्या असतील, तर त्यासाठी दोन वर्षांचा कालावधी असेल. २०३० नंतर मात्र बदल करता येणार नाहीत. त्या अनुषंगाने शिक्षण संचालनालय योग्य ती पाऊले टाकत आहे. एनईपीच्या अनुषंगाने अनेक निर्णय घेतले जात आहेत, परंतु या निर्णयांमुळे कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्यांचे (Students) नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जात जाणार आहे, असेही लोलयेकर यांनी सांगितले.
एनईपीच्या अनुषंगाने राज्यात एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आलेल्या एनसीईआरटी, परख, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अधिकारी यांनी गोव्यात (Goa) ज्या पद्धतीने नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्याची स्तुती केल्याचे राज्य शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.