Assembly Elections: विधानसभा निवडणुकीत कथित पैसे वाटपाबाबतचा टिकलोंचा दावा कोर्टाने फेटाळला: कार्लुस फेरेरा

Carlos Ferreira: म्हापशातील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अ‍ॅड. फेरेरा म्हणाले की, ग्लेन टिकलोंनी माजी मुख्यमंत्र्यांसह १२ जणांविरोधात तक्रार केली होती.
Carlos Ferreira
Carlos Ferreira Dainik Gomantak

Assembly Elections: मार्च २०१२ च्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस सदस्यांकडून कथित पैशांचे वाटप होत असल्याचा दावा करीत माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी खोटी तक्रार केली. मात्र, ही तक्रार तथ्यहीन असल्याचे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हे प्रकरण पुराव्याअभावी फेटाळले, असे हळदोणेचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी मंगळवारी सांगितले.

म्हापशातील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अ‍ॅड. फेरेरा म्हणाले की, ग्लेन टिकलोंनी माजी मुख्यमंत्र्यांसह १२ जणांविरोधात तक्रार केली होती. त्यांच्या दाव्यानुसार संबंधितांकडून आचारसंहितेच्या काळात लोकांना पैसे वाटप सुरू होते. असे तक्रारीत टिकलोंनी म्हटले होते. मात्र टिकलो हे घटनास्थळी त्या दिवशी हजर नव्हते. तरीही टिकलोंनी खोटी तक्रार केली, असे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्टरित्या नमूद केले आहे. या खोट्या तक्रारीमुळे लोकांना अकारण मानसिक त्रास सहन करावा लागला.

तसेच कोर्टाच्या येरझाऱ्या माराव्या लागल्या. मुळात लोकप्रतिनिधींनी अशाप्रकारे खोट्या तक्रारी दाखल करू नये असा सल्ला देत फेरेरांनी टिकलोंच्या कृतीवर तोंडसुख घेतले. २०१२ पासून ते २९ एप्रिल २०२४ पर्यंत हे प्रकरण लांबले. यावर फेरेरांनी जोर दिला.

Carlos Ferreira
Assembly Election 2023 : लोकसभेची सेमी फायनल ‘मोदी गॅरंटी’ने जिंकली

टिकलोंकडून लोकांची दिशाभूल

हळदोणा मार्केट कॉम्प्लेक्सवर भाष्य करताना फेरेरा म्हणाले की, मुळात ग्लेन टिकोलोंनी मार्केटच्या पुनर्बांधणीसंदर्भात कधीच तत्वतः मान्यता आणली नाही. मात्र, आपल्या कार्यकाळातच हळदोणा मार्केटच्या नूतनीकरणास तत्त्वतः मान्यता मिळाली. सध्या टिकलो यांची मानसिक संतुलन बिघडले असून ते लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप फेरेरांनी केला.

Carlos Ferreira
CM Pramod Sawant: ''किनारी भागातील व्यवसायांच्या संरक्षणासाठी...''; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलं आश्वस्त

मुख्यमंत्र्यांनी पोलिसांवर वचक ठेवावा

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत बोलताना फेरेरा म्हणाले की, निवडणुकीच्या काळात चोऱ्यांच्या घटना वाढल्या आहेत. नुकताच बोडगेश्वर मंदिराला चोरांनी लक्ष्य केले. निवडणुकीवेळी लोक आपल्या गावी जातात. मुळात गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी आवश्यक निर्देश देत पोलिसांवर वचक ठेवणे आवश्यक आहे. कारण कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही गृहमंत्र्यांची असते असेही फेरेरा म्हणाले. गृहमंत्र्यांनी आपल्या वेळेचे नियोजन करून प्रशासन व पोलिसिंगवर लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com