डिचोली, लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आपले भवितव्य अजमावीत असलेले ‘भंडारी’ समाजाचे नेते श्रीपाद नाईक यांच्या विजयासाठी मतभेद बाजूला ठेवून समाज बांधवांनी संघटित व्हावे. असे आवाहन डिचोली तालुका भंडारी समाज समितीचे माजी अध्यक्ष आनंद नार्वेकर यांनी केले आहे.
भंडारी समाजाच्या माजी समितीचा श्रीपाद नाईक यांना पूर्ण पाठिंबा असून त्यांच्या विजयासाठी कार्य करणे गरजेचे आहेत. समाजहितासाठी, समाजाच्या कल्याणासाठी समाजात एकता असणे गरजेचे आहे, असे श्री. नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
गुरुवारी सायंकाळी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आनंद नार्वेकर यांनी श्रीपाद नाईक हेच पुन्हा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. पांडुरंग वायंगणकर, सुभाष गावकर आणि पांढरे उपस्थित होते. श्रीपाद नाईक यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांना खासदार म्हणून आणखी एक संधी देण्यासाठी भंडारी समाज बांधवांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आनंद नार्वेकर यांनी केले आहे.
फुकटचा सल्ला नको
हरवळे येथील श्री रुद्रेश्वर देवस्थानात निर्माण झालेल्या वादानंतर ''भंडारी'' समाजातील काहीजणांनी श्रीपाद नाईक यांना लक्ष्य केले. लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासाठी काम करू नका. असा सल्लाही या लोकांनी दिला, असा सल्ला देणाऱ्या भंडारी समाज बांधवांनी अगोदर समाजासाठी स्वतः काय केले, ते अगोदर स्पष्ट करावे आणि नंतरच सल्ला द्यावा, असे आनंद नार्वेकर म्हणाले.
फुकटचा सल्ला देणाऱ्या लोकांपासून भंडारी बांधवांनी सावध रहावे आणि समाजाचे नेते श्रीपाद नाईक यांना निवडून आणण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करावे, असे आवाहनही आनंद नार्वेकर आणि सुभाष गावकर यांनी केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.