डिचोली, ‘आमठाणे’तील जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी या धरणात अखेर साळ बंधाऱ्यातून अतिरिक्त पाणी सोडण्यात आले आहे. ऐन एप्रिल महिन्यात या धरणातील पाणी आटल्याने बंधाऱ्यातील पाणी धरणात सोडण्याचा निर्णय जलस्रोत खात्याकडून घेण्यात आला आहे.
पावसाळ्यापर्यंत धरणात पाणी पुरवठा करण्यात येणार असून, तोपर्यंत धरणातील जलसाठ्यावर आणखी परिणाम होणार नाही, असे जलस्रोत ात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या धरणातील जलसाठा घटल्याचे वृत्त दै. ''गोमन्तक'' मधून प्रसिद्ध करण्यात आले होते. आमठाणे धरणातील पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात सोडण्यात येते. ण्यात येते.
जलसाठ्यात घट
मेणकुरे-धुमासे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या आमठाणे धरणाचे कार्यक्षेत्र ५८२ हेक्टर मीटर एवढे आहे. तर पाण्याची पातळी ५२ मीटर एवढी आहे. गेल्या आठवड्यापर्यंत या धरणातील जलसाठ्याची पातळी ८ मीटरनी घटताना ती ४४ मीटर एवढी झाली होती.
जलसाठा हळूहळू घटत होता. काल (गुरुवारी) सायंकाळपर्यंत या धरणातील जलसाठा ४३.८ मीटर एवढा झाला होता. धरणाच्या सभोवतालचे पात्र कोरडे पडले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.