Sanguem News: 'तारीमळ'वासियांचा रस्ता होणार बंद! बेंडवाडा-सांगे पुलाचे ग्रहण सुटेना; सात वर्षे रेंगाळले काम

Sanguem Bendwada Bridge: बेंडवाडा-सांगे येथील पुलाला लागलेले ग्रहण अद्याप सुटलेले नाही. मुळात पुलाच्या कामाची सुरवात होताच कोरोना महामारी आली आणि नंतर अडचणी वाढतच गेल्या. परिणामी गेली सात वर्षे या पुलाचे काम रेंगाळले आहे.
Sanguem Bendwada Bridge: बेंडवाडा-सांगे येथील पुलाला लागलेले ग्रहण अद्याप सुटलेले नाही. मुळात पुलाच्या कामाची सुरवात होताच कोरोना महामारी आली आणि नंतर अडचणी वाढतच गेल्या. परिणामी गेली सात वर्षे या पुलाचे काम रेंगाळले आहे.
Sange Bendwada BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

Sanguem Bendwada Bridge

सांगे: बेंडवाडा-सांगे येथील पुलाला लागलेले ग्रहण अद्याप सुटलेले नाही. मुळात पुलाच्या कामाची सुरवात होताच कोरोना महामारी आली आणि नंतर अडचणी वाढतच गेल्या. परिणामी गेली सात वर्षे या पुलाचे काम रेंगाळले आहे. दरम्‍यान, तारीमळ सांगे येथील नागरिकांनी आपल्या गावात जाणारा रस्ता बंद होणार असल्याने पर्यायी रस्‍त्‍यासाठी एकजुटीने मागणी केली आहे.

मुख्य रस्त्यापासून तारीमळ गाव अवघ्या पाचशे सहाशे मीटर अंतरावर आहे. या रस्त्यावर पुलाचे बांधकाम येत असल्यामुळे तारीमळ भागात जाणारा रस्ता बंद होणार आहे. त्या भागातील जनतेला जाण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था पुलाच्या बांधकाम आराखड्यात नसल्याने यापूर्वीसुद्धा तारीमळवासीयांनी बांधकाम कंत्राटदाराला जाब विचारला होता. मात्र थातूरमातूर उत्तरे त्‍याच्‍याकडून देण्यात आली होती.

स्थानिक आमदारांना याबाबतची कल्‍पना दिली असता त्‍यांनी, आपण पर्यायी वाहतूक व्यवस्था आराखड्यात केली असल्याचे कागदपत्रे आणून दाखवितो, असे उत्तर दिले होते. पण अद्याप पर्यायी व्यवस्था दाखविणारा कागदही नाही आणि कंत्राटदारही नसल्याचे कोस्तांव मास्कारेन्‍हस यांनी सांगितले. गावातील महिला म्हणाल्या, जर कंत्राटदार गावात जाणारा रस्ता अडवून बांधकाम करत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू. सांगे शहर केवळ दीड किमी अंतरावर आहे आणि हा रस्ताच बंद करून टाकल्यास शहरात जाण्यासाठी पाच किलोमीटर अंतर कपावे लागणार आहे. हे ग्रामस्थांना परवडणारे नाही.

Sanguem Bendwada Bridge: बेंडवाडा-सांगे येथील पुलाला लागलेले ग्रहण अद्याप सुटलेले नाही. मुळात पुलाच्या कामाची सुरवात होताच कोरोना महामारी आली आणि नंतर अडचणी वाढतच गेल्या. परिणामी गेली सात वर्षे या पुलाचे काम रेंगाळले आहे.
Saligao Theft: घरमालकाच्या मोबाईलवरून 'ऑनलाईन' चोरी! गोव्यातील अजब प्रकार; संशयिताच्या कर्नाटकमध्ये आवळल्या मुसक्या

उड्डाणपूल हाच एकमेव पर्याय

तारीमळ गावात जाणारा रस्ता बंद न करता नवीन बांधणाऱ्या पुलाचा भाग उड्डाणपुलाने पूर्ण केल्यास ग्रामस्‍थांना आहे त्याच रस्त्याचा वापर करणे शक्य होईल. पुलाचा आराखडा तयार करताना ग्रामस्‍थांना विश्‍‍वासात घेतले नाही. आता उड्डाणपूल हाच पर्याय आहे, असे त्‍यांचे म्‍हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com