Balrath Strike Ends: मुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी; बालरथ कामगारांचा संप मागे

चालक, अटेंडंटच्या पगारात वाढ
Balrath Employees Strike
Balrath Employees StrikeDainik Gomantak
Published on
Updated on

Balrath Strike Ends: वेतनवाढीसाठी बालरथ कामगारांनी सुरू केलेला संप आज, बुधवारी मागे घेण्यात आला. या प्रकरणीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची शिष्टाई यशस्वी ठरली. त्यांनी कामगारांना पगारवाढीचे आश्वासन दिले. त्यानुसार आता बालरत चालकांचा पगार मासिक 17 हजार रूपये तर अटेंडंटचा पगार मासिक 10 हजार रूपये होणार आहे. या निर्णयानंतर कामगारांनी संप मागे घेतला.

वेतन वाढीच्या मागणीसाठी युनायटेड बालरथ कामगार युनियन संघटनेच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व बालरथ कामगार सोमवारपासून संपावर गेले होते.

पणजीतील आझाद मैदानावरही या कामगारांनी ठिय्या मांडला होता. या संपामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. शिक्षण संचालनालयाने वाढवलेले वेतन कामगार संघटनेला मंजूर नव्हते. या संपात राज्यातील 420 बालरथांवरील चालक-क्लिनर असे 840 कामगार सहभागी झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com