Arambol: काजू-आंबा पीक संकटात? शेतकऱ्यांना धास्ती; हरमल भागात धुक्यामुळे दुष्परिणाम होण्याची शक्यता

Cashew Mango Farming Goa: काही शेतकऱ्यांची आंबा झाडे भाडेपट्टीवर एक-दोन हंगामासाठी दिली असल्याने ती घेतलेल्यांनाही नुकसान सोसावे लागेल, अशी चिन्हे आहेत.
Cashew mango farming
Cashew mango farmingDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Agriculture Issues

हरमल: हरमल भागातील काजू, आंबा व अन्य प्रकारच्या बागायतींवर धुक्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम नुकसानीचा तर जाणार नाही ना, अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

या भागात रविवारी पहाटेही दाट धुके पडले होते. या धुक्याचा काजू व आंबा बागायतीवर विपरीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काजू, आंब्याचा मोहोर करपण्याची, गळून पडण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदाचा फळ लागवडीचा हंगाम चुकणार, अशी भीती शेतकरी मनोहर नाईक यांनी व्यक्त केली आहे.

Cashew mango farming
Goa Opinion: तरच 'माणूस' वाचू शकेल! उष्णतेची लाट, पूरस्थिती, चक्रीवादळाच्या समस्या; मानवी अस्तित्वाच्या लढाईचे भयंकर पर्व

काही शेतकऱ्यांची आंबा झाडे भाडेपट्टीवर एक-दोन हंगामासाठी दिली असल्याने ती घेतलेल्यांनाही नुकसान सोसावे लागेल, अशी चिन्हे आहेत. या झाडांची लागवड करण्यासाठी वरचेवर औषध फवारणी तसेच कामगारांचे वेतन द्यावे लागते. यंदाच्या उत्पन्नातून हा खर्च तरी निघेल की नाही, अशी धास्ती शेतकऱ्यांना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com