
पणजी : प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, तसेच जिल्हा-उपजिल्हा इस्पितळांतून गोमेकॉत स्थलांतरित करीत असताना गेल्या साडेचार वर्षांत ८८ रुग्णांचा वाटेतच मृत्यू झाला.
आमदार विजय सरदेसाई यांनी याबाबत विधानसभेत विचारलेल्या लेखी प्रश्नाला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांतून गोमेकॉत नेताना ४९, तर जिल्हा-उपजिल्हा इस्पितळांतून गोमेकॉत नेत असताना ३९ रुग्णांचा वाटेतच मृत्यू झाल्याचे सांगत, त्यासंदर्भातील आकडेवारीही मंत्री राणे यांनी सादर केली आहे.
दर महिन्याला घेण्यात येणाऱ्या ऑडिट बैठकीत गोमेकॉत आणताना वाटेत होत असलेल्या मृत्यूंबाबत चर्चा केली जाते. गंभीर रुग्णांना तत्काळ गोमेकॉत दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध करून दिल्या जातात, असेही राणे यांनी म्हटले आहे.
४९ - प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांतून गोमेकॉत नेताना वाटेतच मृत्यू
३९ - जिल्हा-उपजिल्हा इस्पितळांतून गोमेकॉत नेत असताना वाटेतच मृत्यू
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.