लग्नासाठी तरुणाने ओलांडली आंतरराष्ट्रीय सीमा!

नवविवाहित जोडप्याला सीमा सुरक्षा दलाने अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील नाडिया जिल्ह्यातील जयकान्तो चंद्र राय (Jayakanto Chandra Rai) या तरुणाने सोशल मिडियावरुन (Social media) एका बांग्लादेशी तरुणीच्या प्रेमात पडला.
india -bangladesh  border
india -bangladesh borderDainik Gomantak
Published on
Updated on

मागील काही दिवसांपासून बांग्लादेशी (Bangladeshi) घुसखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापत आहे. याच मुद्यावरुन पश्चिम बंगालच्या (West Bengal) विधानसभा निवडणूकीमध्ये भाजप आणि तृणमुल कॉंग्रेस (Trinamool Congress) समोरासमोर आले होते. त्यात आता दोनच दिवसांपूर्वी बांग्लादेशी आणि रोहिंग्या नागरिकांना (Rohingya citizens) हाकलून लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. ही सर्व पार्श्वभूमी असताना बांग्लादेशमध्ये जाऊन लग्न करणं एका भारतीयाला चांगलंच महागात पडलं आहे.

नवविवाहित जोडप्याला सीमा सुरक्षा दलाने अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील नाडिया जिल्ह्यातील जयकान्तो चंद्र राय (Jayakanto Chandra Rai) या तरुणाने सोशल मिडियावरुन (Social media) एका बांग्लादेशी तरुणीच्या प्रेमात पडला. त्यानंतर एक महिनाभर या जोडप्यांचे हाय हॅलो चाललं. दोघांचे विचार एकमेकांशी जुळल्यानंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमाच्या आणाभाका या दोघांनी घेतल्या आणि लग्न करण्याचं अखेर ठरवलं.

india -bangladesh  border
भारताचा चीनविरुध्द आक्रमक पवित्रा; सीमेवर 50 हजार सैन्य तैनात

पश्चिम बंगालमधील बल्लारपूर (Ballarpur) गावातील हा तरुण आहे. तरुणी बांग्लादेशमधील नेराळी गावाची रहिवासी आहे. या दोघांचं सुत पहिल्यांदा फेसबुकवरुन (Facebook) जुळलं. त्यानंतर जयकान्तो ने 8 मार्चला सीमा ओलांडून बांग्लादेशमध्ये गेला. त्याला बांग्लादेशला जाण्यासाठी त्याने एका दलालाची मदत घेतली. तो 25 जूनपर्यंत बांग्लादेशमध्ये राहिला. त्यानंतर दोघांनी भारतामध्ये येण्यासाठी बांग्लादेशमधील एका दलालाची मदत घेतली. आणि त्याला 10 हजार बांग्लादेशी टाका या दलालाला दिले. त्याच्या मदतीने ते भारताच्या सीमेत घुसले.

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना बेकायदेशीररित्या मधुपुर (Madhupur) येथे काही जण घुसले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना ताब्यात घेतले. चौकशी अंती त्यांना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ताब्यात घेतले.

पुढील कारवाईसाठी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या दोन जोडप्यांना भीमपूर पोलिसांच्या (Bhimpur Police) स्वाधिन केले आहे. आता भीवपूर पोलिस त्यांची कसून चौकशी करत आहेत. बांग्लादेशमधून येण्यासाठी कोण कोणत्या लोकांनी त्यांना मदत केली त्याचाही शोध घेण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com