Pakistan: भारत वापरतोय ॲंटीपाकिस्तान प्रपोगंडा - पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याचे वक्तव्य
भारतीय परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी ऑस्ट्रिया दौऱ्यादरम्यान, पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तान आंतकवादाचे केंद्र आहे या शब्दात पाकिस्तानवर टीका केली होती.आता पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने याचे उत्तर दिले आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्र्याने केलेले आरोप चुकीचे आहेत आणि त्यात कोणतेही तथ्य नाही या शब्दात एस.जयशंकर यांच्या आरोपांचे खंडन केले आहे.ऑस्ट्रीयामध्ये एका मुलाखतीत दहशतवादावर बोलताना पाकिस्तान दहशतवादाचा केंद्रबिंदू आहे.सीमापार दहशतवाद पसरवण्यात पाकिस्तानचा मोठा हात आहे.
जगाने पाकिस्तानपासून दूर राहिले पाहिजे त्याचबरोबर सावधही राहिले पाहिजे असे जयशंकर यांनी म्हटले आहे. यानंतर पाकिस्तानने संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानला बदनाम करण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर भारतमंत्र्याचे हे वक्तव्य त्यांचा हताशपणा दाखवते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.