Pakistan: परवेज मुशर्रफ आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यातील करार...

Pakistan: परवेज मुशर्रफ यांनी या पुस्तकात दावा केला आहे की, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना भारतात येण्याचे आंमत्रण दिले होते.
General Pervez Musharraf (Retd)
General Pervez Musharraf (Retd) Dainik Gomantak

Pakistan: पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे दीर्घआजाराने निधन झाले आहे. परवेज मुशर्रफ हे कारगिलच्या युद्धासाठी ओळखले जातात.

मुशर्रफ यांनी पाकिस्तान आणि भारतामध्ये सांमजस्य व्हावे यासाठी प्रयत्न केले होते. आता त्यांच्या निधनानंतर पुन्हा या सामंजस्य कराराची चर्चा होताना दिसत आहे. इन द लाइन ऑफ फायर या जीवनचरित्रात परवेज मुशर्रफ यांनी म्हटले आहे की, मध्ये गुजरात( Gujrat )मध्ये झालेल्या भूकंपानंतर दोन्ही देशांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांना वाटले होते.

General Pervez Musharraf (Retd)
Bomblast In Pakistan: पाकिस्तानमध्ये पुन्हा बॉम्बस्फोट, क्वेट्टा शहरात स्फोटामुळे अनेक जण जखमी

परवेज मुशर्रफ यांनी या पुस्तकात दावा केला आहे की, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना भारतात येण्याचे आंमत्रण दिले होते. त्यानंतर आग्र्यामध्ये अटलबिहारी वाजपेयी आणि परवेज मुशर्रफ यांच्यामध्ये जुलै 2001 मध्ये ही बैठक पार पडली.

अटल बिहारी वाजपेयी आणि मुशर्रफ यांना हा करार मान्य होता. मात्र, भारतीय कॅबिनेटने हा करार अमान्य केल्याने हा करार होऊ शकला नाही असे मुशर्रफ यांनी म्हटले नाही. मुशर्रफ या पुस्तकात असेही म्हटले आहे की, मी आग्रा( Agra ) सोडण्यापूर्वी वाजपेयींची भेट घेतली होती आणि त्यावेळी त्यांना म्हटले होते की,आपल्यावर कोणातरी हुकुमत गाजवू पाहत आहे. अशा प्रकारे, भारत पाकिस्तान मधला हा करार पुर्णत्वास येऊ शकला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com