भारत काश्मीरमधील लोकांवर अन्याय करतोय; पाकिस्तानी राष्ट्रपतींचा आरोप

पाकिस्तानचे राष्ट्रपती (Pakistan President) आरिफ अल्वी (Arif Alvi) यांनी आरोप केला की, भारत (India) चीनशी (China) असलेले त्यांचे संबंध खराब करण्याचा प्रयत्न करत आहे.
India is doing injustice to the people of Jammu- Kashmir Pakistan President Arif Alvi
India is doing injustice to the people of Jammu- Kashmir Pakistan President Arif AlviDainik Gomantak

पाकिस्तानचे राष्ट्रपती (Pakistan President) आरिफ अल्वी (Arif Alvi) यांनी आरोप केला की, भारत (India) चीनशी (China) असलेले त्यांचे संबंध खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. अल्वी म्हणाले, पाकिस्तानला नेहमीच आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध हवे असतात. पण भारताने पाकिस्तनची ही इच्छा दुर्बलता म्हणून घेतली आहे. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी हे विधान विधानसभेच्या चौथ्या संसदीय वर्षाच्या सुरुवातीच्या निमित्ताने, द्विसदनीय संसदेचे कनिष्ठ सभागृहात केले आहे. (India is doing injustice to the people of Jammu- Kashmir Pakistan President Arif Alvi)

पाकिस्तानमधील दहशतवादी तळावर भारतीय हवाई दलाच्या हवाई हल्ल्याची आठवण करून देताना अल्वी म्हणाले, पाकिस्तानला नेहमीच आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध हवे असतात. पण भारताने तो आपला एक कमकुवतपणा मानला आहे . 26 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश केला आणि बालाकोटमधील जैशच्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला होता.

India is doing injustice to the people of Jammu- Kashmir Pakistan President Arif Alvi
अफगाणिस्तानात सध्या स्थापन केलेले सरकार तात्पुरते; तालिबान प्रवक्त्यांची माहिती

तत्पूवी भारताने पाकिस्तानला कळवले आहे की त्याला दहशतवाद, शत्रुत्व आणि हिंसामुक्त वातावरणात इस्लामाबादसोबत सामान्य शेजारी संबंध हवे आहेत. भारताने हा संदेश अनेक वेळा दिला आहे की दहशतवादापासून मुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे.

अलवींचा काश्मिरी राग

भारत काश्मीरमधील लोकांवर अन्याय करत असल्याचा आरोप अल्वी यांनी केला असून ते म्हणाले, मला भारताला भारतातील अत्याचार थांबवायला सांगायचे आहे आणि काश्मीरमध्ये स्वयंनिर्णयाचे वचन पूर्ण करायचे आहे. अल्वी म्हणाले, पाकिस्तानला अफगाणिस्तानात शांतता हवी आहे आणि पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये एक महत्वाची सकारात्मक भूमिका बजावत आहे.

India is doing injustice to the people of Jammu- Kashmir Pakistan President Arif Alvi
भारताला शह देण्यासाठी तालिबानी सरकार पाकिस्तान चालवत आहे :गुप्तचर संघटना

भारत पाक-चीन संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे

पाकिस्तानच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल अल्वी यांनी चीनचे कौतुकही केले. ते म्हणाले, "चीन-पाकिस्तान संबंध बिघडवण्याचे भारताचे प्रयत्न असूनही, इस्लामाबादने बीजिंगशी असलेल्या संबंधांना अत्यंत आदराने वागवले." ते म्हणाले, "आम्ही चीनशी असलेल्या संबंधांकडे मोठ्या आदराने पाहतो आणि त्यांना मजबूत करू इच्छितो." मला भारताला हे स्पष्टपणे सांगायचे आहे की ते आपल्या ध्येयांमध्ये कधीही यशस्वी होणार नाही आणि पाक-चीन मैत्री अधिक मजबूत होत राहील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com