India Pakistan Tensions: 'भारताच्या हवाई संरक्षणाबाबत चीनने पुरवली गुप्तचर माहिती...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचा खळबळजनक खुलासा

China Shared Intelligence With Pakistan: पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक मोठा खुलासा केला आहे.
Defense Minister of Pakistan Khawaja Asif
Defense Minister of Pakistan Khawaja AsifDainik Gomantak
Published on
Updated on

China Shared Intelligence With Pakistan: पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक मोठा खुलासा केला आहे. ख्वाजा आसिफ यांनी कबूल केले की, 'भारतासोबतच्या संघर्षादरम्यान पाकिस्तानला चीनकडून मदत मिळत होती.' ख्वाजा म्हणाले की, 'चीन भारताबद्दलची गुप्तचर माहिती पाकिस्तानशी शेअर करत होता. दोन्ही देशांच्या संघर्षादरम्यान चीनने भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेशी संबंधित माहिती पाकिस्तानसोबत शेअर केली होती.'

चीनने पाकिस्तानला गुप्तचर माहिती दिली का?

मुलाखतीदम्यान ख्वाजा आसिफ म्हणाले की, 'भारतासोबतच्या (India) शॉर्ट वॉरपासून पाकिस्तान हाय अलर्टवर आहे. पाकिस्तानने आपली सतर्कता कमी केलेली नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की आम्ही सुरुवातीपासून आतापर्यंत ही सतर्कता कमी केलेली नाही. एका महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. सामरिकदृष्ट्या एकमेकांशी निगडित असलेले देश गुप्तचर माहिती एकमेकांना शेअर करत असतात.''

Defense Minister of Pakistan Khawaja Asif
India-Pakistan Tension: ''युद्धात शत्रूला कसं गाडायचं भारत जाणतो...'', आदमपूर एअरबेसवरुन PM मोदी गरजले

दोन्ही देश गुप्तचर माहिती एकमेकांना देतात

आसिफ पुढे म्हणाले की, आमच्याकडे असलेली माहिती आम्ही चीनशी शेअर करतो. ही एक सामान्य गोष्ट आहे. चीनलाही भारतासोबत समस्या आहेत. सामरिकदृष्ट्या एकमेकांशी निगडित असलेली माहिती देश एकमेकांना गुप्तचर माहिती शेअर करत असतात. चीन आणि पाकिस्तान सॅटेलाइटच्या माध्यमातून मिळवलेली माहिती एकमेकांना शेअर करतात.

Defense Minister of Pakistan Khawaja Asif
India Pakistan Tension: म्हणे, S-400 सिस्टिम उद्ध्वस्त केली, पाकड्यांचं खोटं पुन्हा भारतानं पकडलं; PM मोदींनी फोटो केले शेअर

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या भीषण हल्ल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत भारताने कठोर पावले उचलत पाकिस्तानला (Pakistan) चोख प्रत्युत्तर दिले होते.7 मे रोजी मध्यरात्री भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. हे हवाई हल्ले त्या ठिकाणांवर करण्यात आले होते, जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्याचे नियोजन करण्यात आले होते. भारतीय सैन्य दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत मुजफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूरमधील दहशतवादी तळांवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com