"काहीही झालं तरी सीएए लागू होऊ देणार नाही"; राहुल गांधींचा घणाघात

We will not let the CAA to implement in India said Rahul Gandhi in Assam
We will not let the CAA to implement in India said Rahul Gandhi in Assam

गुवाहाटी : येत्या काही महिन्यांत आसाममध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरुवात केली आहे. शिवसागर येथून निवडणूक प्रचाराची सुरूवात करताना, बेकायदेशीर स्थलांतर करणे हा आसाममधील एक महत्तवाचा मुद्दा आहे. परंतु, हा हा प्रश्न सोडवण्याची क्षमता आसाममधील लोकांमध्ये आहे असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी म्हणाले, "आसाममधील लोक भाराताच्या पुष्पगुच्छाची फुले आहेत. जर आसामच्या लोकांना त्रास सहन करावा लागला, तर देशाला त्रास होईल."

शिवसागर जिल्ह्यातील शिवनगर बोर्डींग मैदानावरुन राहुल गांधींनी निवडणूक प्रचारादरम्यान आसामचे माजी मुख्यमंत्री व दिवंगत नेते तरुण गोगोई यांचं कौतुक केलं. भाजपवर हल्ला चढवत राहुल गांधी म्हणाले, "काहीही झाले तरी सीएए कधीही लागू होणार नाही.जे लोक आसाममध्ये द्वेष पसरविण्याचा प्रयत्न करतील त्यांना इथली जनता आणि कॉंग्रेस धडा शिकवतील असे राहुल गांधी म्हणाले.  कॉंग्रेस हा नेहमीच लहान व्यापारी आणि दुर्बल लोकांचा पक्ष राहीला आहे."

"जेव्हा आमचा पक्ष सत्तेत येईल, तेव्हा आम्ही सर्व धर्म आणि जातींच्या लोकांचे संरक्षण करू.2004 से 2014  पर्यंत भारतात वेगाने आर्थिक वाढ झाली. त्यावेळी आमच्या सरकारने कोट्यवधी लोकांना दारिद्र्यरेषेमधून बाहेर काढले होते. आम्ही आसाममधील बेरोजगारी संपवू. आता आसामच्या रिमोट सरकारपासून मुक्त होण्याची वेळ आली आहे. रिमोटने दुरदर्शन चालू शकते,पण आसाम नाही. आपला मुख्यमंत्री हा आसामचाच असला पाहिजे", असं राहुल गांधी म्हणाले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com