
कर्नाटक सरकारने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ला जबाबदार धरले आहे, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक जण जखमी झाले. उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात सरकारने म्हटले आहे की फ्रँचायझीने एकतर्फी आणि पोलिसांच्या पूर्व परवानगीशिवाय विजय परेड आयोजित केली होती.
अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की, विराट कोहलीचा व्हिडिओ देखील मोठ्या संख्येने गर्दी जमण्यामागे एक मोठे कारण होते. असे म्हटले जाते की विराट, जो एक मोठा खेळाडू आहे, त्याने व्हिडिओद्वारे लोकांना विजय परेडमध्ये येण्याचे आवाहन केले होते. यामुळेच मोठ्या संख्येने चाहते जमले होते.
सुरुवातीला सरकारला गुप्त ठेवायचे होता, तो अहवाल उच्च न्यायालयाने गोपनीय ठेवण्याचा कोणताही कायदेशीर आधार नसल्याचे ठरवल्यानंतर सार्वजनिक करण्यात आला. अहवालात आरसीबी आणि त्याच्या आयोजकांच्या अनेक चुकांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, अहवालात असे म्हटले आहे की आरसीबीने कायद्यानुसार आवश्यक असलेली औपचारिक विनंती सादर करण्याऐवजी, ३ जून रोजी, ज्या दिवशी संघाने १८ वर्षांनंतर आयपीएलचे विजेतेपद जिंकले, त्या दिवशी पोलिसांना संभाव्य विजय परेडची माहिती दिली.
अहवालात असे म्हटले आहे की , विहित नमुन्यात कोणताही अर्ज सादर केला गेला नाही. परिणामी, क्यूबन पार्क पोलिस स्टेशनने गर्दीची संख्या किंवा सुरक्षा योजना याबद्दल कोणतीही माहिती नसल्याच्या कारणास्तव परवानगी नाकारली. तरीही, आरसीबीने पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
फ्रँचायझीने ४ जून रोजी सकाळी ७:०१ वाजता सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसाठी खुले आमंत्रण पोस्ट केले, ज्यामध्ये विजय परेडसाठी मोफत सार्वजनिक प्रवेशाची घोषणा करण्यात आली. सकाळी ८ वाजता आणखी एक पोस्ट करण्यात आली. सकाळी ८:५५ वाजता, आरसीबीच्या अधिकृत हँडलवर विराट कोहलीचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला, ज्यामध्ये चाहत्यांना संघासोबत आनंद साजरा करण्याचे आमंत्रण देण्यात आले.
अहवालात म्हटले आहे की- त्यानंतर ०४.०६.२०२५ रोजी सकाळी ८:५५ वाजता, आरसीबीने आरसीबीच्या अधिकृत हँडल @Rcbtweets वर आरसीबी संघाचा प्रमुख खेळाडू विराट कोहलीची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली, ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की संघाला ०४.०६.२०२५ रोजी बेंगळुरू शहरातील लोकांसह आणि आरसीबी चाहत्यांसह बेंगळुरूमध्ये हा विजय साजरा करायचा आहे.
दुपारी ३:१४ वाजता (कार्यक्रम सुरू होण्याच्या नियोजित वेळेच्या फक्त ९० मिनिटे आधी) अंतिम अपडेटमध्ये पहिल्यांदाच स्पष्ट करण्यात आले की मर्यादित पास आवश्यक आहेत, जे आधीच्या पोस्टपेक्षा वेगळे होते. या उशिरा स्पष्टीकरणामुळे गोंधळ निर्माण झाला आणि गर्दीत असंतोष निर्माण झाला, असे अहवालात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.