Manali Silent Villages: मनालीतील 'ही' 9 गावे पुढील 42 दिवस चिडीचूप! जाणून घ्या नेमके कारण...

टीव्ही, मोबाईल फोनही राहणार बंद; पर्यटकांनाही पाळावे लागणार नियम
Manali Silent Villages
Manali Silent VillagesDainik Gomantak

Manali Silent Villages: हिमाचल प्रदेशातील मनालीजवळील गोशाळे आणि लगतच्या 8 गावांमध्ये आता दीड महिना शांतता पाहायला मिळणार आहे. येथे कोणत्याही प्रकारचा आवाज ऐकू येणार नाही. या गावांमध्ये ना टीव्ही, ना मोबाईल फोन किंवा मंदिराची घंटादेखील ऐकू येणार नाही. विशेष म्हणजे, येथे येणाऱ्या पर्यटकांनाही या नियमांचे पालन करावे लागणार आहे. देवांच्या आदेशामुळे मनालीमध्ये ही पुर्वापार परंपरा जोपासली जात आहे.

मनालीच्या उझी खोऱ्यातील नऊ गावे आजही हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या देव परंपरेचे पालन करत आहेत. ऐतिहासिक गाव गौशाळमध्ये मकर संक्रांतीनंतर पुन्हा एकदा टीव्ही बंद करण्यात आला आहे. यासोबतच मोबाईल फोनही सायलेंट मोडवर ठेवण्यात आले आहेत. तसेच, येथे कोणीही मोठ्याने बोलू शकत नाही. पुढील दीड महिना शेतीची कामे होणार नाहीत.

मंदिरात पुजेबरोबरच घंटाही बांधून टाकण्यात आल्या आहेत. वास्तविक हे आदेश येथील आराध्य दैवत मानले जात असलेले गौतम ऋषी, ब्यास ऋषी आणि नाग देवता यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच ही परंपरा पुर्वापार चालत आली आहे. आताही या गावातले ग्रामस्थ आगामी दीड महिना या आदेशाचे पालन करतील.

या 9 गावांना आदेश

मनालीच्या गौशाल, कोठी, सोलांग, पलचन, रुआड, कुलंग, नाशनाग, बुरुआ आणि मझाच या गावांमध्ये देव परंपरा खूप चांगल्या प्रकारे पाळली जाते. तरुण पिढीही शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा पाळत आहे. येथे येणारे पर्यटक देखील ही परंपरा पाळत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशातील इतरही काही जिल्ह्यांमध्ये या परंपरेचे पालन केले जात असल्याचे सांगितले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com