"ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू नाही" आरोग्य राज्यमंत्र्यांचा अजब दावा

कॉंग्रेसचे खासदार वेणुगोपाल यांच्या या प्रश्नाला राज्यसभेत आरोग्य राज्यमंत्र्यांनी लेखी उत्तर देताना हे आश्चर्यकारक विधान केले आहे
There is no death in a country dew to lack of oxygen  Minister of State for Health
There is no death in a country dew to lack of oxygen Minister of State for HealthDainik Gomantak

देशात कोरोनाच्या दुसऱ्या(Covid19) लाटेत अनेक रुग्णांचा मृत्यू झाला तसेच या लाटेत देशाची आरोग्य यंत्रणा अक्षरश कोलमडून पडली, रुग्ण इतके वाढले की कुठे बेड भेटत नव्हते तर कुठे डॉक्टर्स आणि यातच ऑक्सिजन(Oxygen) तुटवडा होत गेला आणि अनेकांना आपला जीव गमवावा लागला , देशातील अनेक राज्यात ऑक्सिजन तुटवडा इतका भासला की आरोग्य यंत्रणा हतबल झाली. पण आपल्या देशाच्या आरोग्य राज्यमंत्र्यांनी(Health Ministry) या सगळ्या परिस्थितीवर बोलताना एक अजबच दावा केला आहे आणि त्यांच्या या दाव्याने अनेकांना बुचकळ्यात पडले आहे. त्यांच्या या दाव्यानुसार ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे देशात एकाचाही मृत्यू झाला नाही. (Corona Death)

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या अभावामुळे बरेच कोविड रुग्ण मरण पावले होते? कॉंग्रेसचे खासदार वेणुगोपाल यांच्या या प्रश्नाला राज्यसभेत आरोग्य राज्यमंत्र्यांनी लेखी उत्तर देताना हे आश्चर्यकारक विधान केले आहे.या प्रश्नाच्या उत्तरात आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे- आरोग्य हा राज्याचा विषय आहे. राज्य व केंद्रशासित प्रदेश आरोग्य मंत्रालयाला नियमितपणे मृत्यूच्या अहवालांची सविस्तर माहिती देतात. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वृत्तानुसार, देशात ऑक्सिजन नसल्यामुळे एकही मृत्यू झाला नाही.

आरोग्य राज्यमंत्र्यांच्या या उत्तरामुळे आता नवीन वाद निर्माण झाला आहे.

There is no death in a country dew to lack of oxygen  Minister of State for Health
Earthquake: देशात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के

तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत राज्यसभेत विरोधी पक्षातील खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया म्हणाले की, "मोदीजींनी मृत्यूची नोंद घ्या, ती लपवू नका. फक्त राज्य सरकारने ही नोंद करावी लागेल मृत्यू. पण विरोधक जो आरोप करत आहेत की भारत सरकार आकडेवारी लपवत आहे हे अत्यंत चुकीचे आहे. "

तर दुसरीकडे, सरकार आंधळे आणि असंवेदनशील आहे, असे सांगत आरोग्य राज्यमंत्र्यांच्या उत्तरावर कॉंग्रेसने तीव्र टीका केली आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे सामान्य लोकांनी आपल्या जवळच्या आणि प्रियजनांचा मृत्यू होत असल्याचे पाहिले आहे. आता कॉंग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल यांनी आरोग्य राज्यमंत्री यांच्याविरूद्ध विशेषाधिकार प्रस्तावाचा भंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य राज्यमंत्र्यांनी संसदेत चुकीचे वक्तव्य केल्याचा त्यांचा आरोप आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com