पर्यटनाला चालना देण्यासाठी 'भारत गौरव' ट्रेन लवकरच होणार सुरु

भारतीय रेल्वेने (Indian Railways) देशाचा वारसा आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी एक नवीन मोहीम सुरु केली आहे.
Indian Railways
Indian RailwaysDainik Gomantak

भारतीय रेल्वेने (Indian Railways) देशाचा वारसा आणि पर्यटनाला (Tourism) चालना देण्यासाठी एक नवीन मोहीम सुरु केली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी मंगळवारी सांगितले की, माल आणि प्रवासी विभागानंतर रेल्वे पर्यटन क्षेत्राला समर्पित तिसरा विभाग सुरु करत आहे. 'भारत गौरव' ट्रेन्स या नावाने सुमारे 190 थीम असलेल्या ट्रेनचा संच सुरु करण्यासाठी रेल्वे तयार आहे.

दरम्यान, पत्रकार परिषदेला संबोधित करताना, रेल्वे मंत्री म्हणाले, या गाड्या खाजगी क्षेत्र तसेच IRCTC या दोन्हींद्वारे चालवल्या जाऊ शकतात. “या नियमित गाड्या नसतील ज्या वेळापत्रकानुसार चालवल्या जातील. या थीम-आधारित ट्रेनसाठी आम्ही 3,033 कोच किंवा 190 ट्रेन ओळखल्या आहेत. प्रवासी आणि वस्तू विभागानंतर आम्ही भारत गौरव गाड्या चालवण्यासाठी पर्यटन विभाग सुरु करणार आहोत. या ट्रेन्स भारताची संस्कृती आणि वारसा दाखवतील. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यासाठी आम्ही आजपासून अर्ज मागवले आहेत. देखभाल, पार्किंग आणि इतर सुविधांसाठी रेल्वे मदत करेल.

मंत्री पुढे म्हणाले की, ही कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याकडून आली आहे, ज्यांनी थीम असलेल्या गाड्या सुचवल्या जेणेकरुन देशातील लोक भारताचा वारसा समजून घेऊ शकतील, तसेच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील.

त्यांनी असेही म्हटले की, या गाड्यांचे भाडे व्यावहारिकरित्या टूर ऑपरेटर ठरवतील परंतु रेल्वे दरांमध्ये कोणतीही असामान्यता नाही याची खात्री करेल. ओडिशा, राजस्थान, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्य सरकारांनी या गाड्या सुरु करण्यामध्ये रस दाखवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com