'शेतकरी सरकार बदलू शकतात': तेलंगणा मुख्यमंत्री

शेतकरी सरकार बदलू शकतात असे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर पंजाबमध्ये म्हणाले.
Telangana Chief Minister KCR
Telangana Chief Minister KCR Dainik Gomantak

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना आणि गेल्या वर्षी शेतकरी आंदोलनात मारले गेलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंजाबमध्ये आहेत. पंजाबमध्ये त्यांनी शेतकरी नेत्यांना आवाहन केले की, 'जोपर्यंत पिकांच्या आधारभूत किमतीला घटनात्मक हमी मिळत नाही, तोपर्यंत केंद्राविरोधात आंदोलन सुरु ठेवावे.' "शेतकरी सरकार बदलू शकतात," असेही ते म्हणाले.

यावेळी प्रमुख शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) उपस्थित होते. राकेश टिकैत हे गेल्या वर्षी वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या नेत्यांपैकी एक होते.

Telangana Chief Minister KCR
शिवराज सिंह चौहानांनी आपल्या पत्नीच्या नावाने चोरली कविता; लोक म्हणाले, 'आमदार चोरणाऱ्यांसाठी कविता चोरणे काय विशेष'

खतांच्या वाढत्या किमती, "दोषपूर्ण" MSP आणि इंधनाच्या किमतींसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन त्यांनी केंद्रावर वारंवार हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, शेतकरी आंदोलनात प्राण गमावलेल्या 600 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांनी संबोधित केले, श्रद्धांजली वाहिली आणि सहानुभूती व्यक्त केली. तेलंगणा (Telangana) सरकारने आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 3 लाख रुपयांची भरपाईही जाहीर केली आहे.

Telangana Chief Minister KCR
Assam Accident: ब्रह्मपुत्रा नदीवर जहाजांचा मोठा अपघात; अनेक लोक बेपत्ता

दुसरीकडे, आपल्या सरकारच्या (Government) कामगिरीवर प्रकाश टाकताना केसीआर म्हणाले की, तेलंगणाच्या स्थापनेपूर्वी शेतकरी अत्यंत संकटात होते. दररोज अनेक लोक आत्महत्या करत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com