Suryakumar Yadav: फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही? पाकड्यांचा रडीचा डाव! 'Sky'च्या 'त्या' वर्तनाविरुद्ध 'ICC'कडे केली तक्रार

PCB file complaint against Suryakumar Yadav: २०२५ च्या आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवच्या विधानांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वाद निर्माण झाला आहे.
PCB file complaint against Suryakumar Yadav
PCB file complaint against Suryakumar YadavDainik Gomantak
Published on
Updated on

२०२५ च्या आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवच्या विधानांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) त्यांच्या विधानांबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) तक्रार दाखल केली आहे, ज्यामुळे भारतीय संघात तणाव निर्माण झाला आहे.

भारतीय संघाने सुपर फोर सामन्यात बांगलादेशला ४१ धावांनी हरवून आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. तरीही, कर्णधार सूर्याविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारीमुळे संघ व्यवस्थापन चिंतेत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा चालू आहे की, ICC सूर्यकुमार यादववर बंदी घालेल की दंड आकारेल, आणि नियम काय सांगतात हे तपासले जात आहे.

पीसीबीने काय तक्रार केली?

१४ सप्टेंबर २०२५ रोजी भारत-पाकिस्तान सुपर फोर सामन्यानंतर सादरीकरण व पत्रकार परिषदेदरम्यान सूर्यकुमार यादवच्या विधानांबद्दल PCBने तक्रार केली. ICC सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी या तक्रारीची माहिती भारतीय संघ व्यवस्थापनाला ईमेलद्वारे पाठवली आहे.

ईमेलमध्ये म्हटले आहे की, सूर्यकुमार यादवच्या विधानांमुळे सामन्याची प्रतिमा धोक्यात येऊ शकते, म्हणून त्यांच्याविरुद्ध आरोप लावण्यात आले आहेत. जर सूर्यकुमार यांनी आरोप स्वीकारले नाहीत तर ICC सुनावणी घेईल, ज्यात सूर्यकुमार, ICC प्रतिनिधी आणि PCBचा प्रतिनिधी उपस्थित राहतील.

सूर्यकुमारवर बंदी?

ICCच्या आचारसंहितेनुसार, हा प्रकरण लेव्हल १ उल्लंघन म्हणून मानले जात आहे.

  • लेव्हल १ उल्लंघन: फक्त दंड आकारला जातो; बंदी घालण्यात येत नाही.

  • लेव्हल २, ३ किंवा ४ उल्लंघन: अपशब्द, धमक्या, बॉल टेम्परिंग यासारख्या गंभीर प्रकारांसाठी बंदी संभवते.

याचा अर्थ असा की, सूर्यकुमार यादववर बंदी घालण्याची शक्यता नाही, परंतु त्यांना सामना शुल्काच्या काही टक्के दंडाची शिक्षा होऊ शकते.

सूर्यकुमार यादव काय म्हणाला होता?

भारत-पाकिस्तान सामन्यानंतर सादरीकरणात सूर्यकुमार यादव म्हणाला, "आम्ही हा विजय पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना आणि आमच्या सैनिकांना समर्पित करतो."

त्याचबरोबर पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, सरकार आणि BCCIने आम्हाला सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचे निर्देश दिले होते. या विधानांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर आणि भारत-पाकिस्तान संबंधांवर चर्चा सुरू आहे, आणि ICCच्या सुनावणीचे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com