Sandeshkhali Violence: ''पाकिस्तानात हिंदू महिलांवर असे अत्याचार होतात...'', संदेशखळी प्रकरणावरुन भाजप खासदार ममता सरकारवर बरसल्या

BJP MP Locket Chatterjee: संदेशखळी (Sandeshkhali) प्रकरणावरुन पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे.
BJP MP Locket Chatterjee
BJP MP Locket Chatterjee Dainik Gomantak

Sandeshkhali Violence: संदेशखळी (Sandeshkhali) प्रकरणावरुन पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. बंगालचे संपूर्ण राजकारण सध्या संदेशखळीभोवती फिरत आहे. तिथल्या काही महिलांनी केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत. स्वतंत्र तपास करण्यात आला मात्र अद्याप आरोपींबाबत कोणताही सुगावा लागलेला नाही. त्या प्रकरणावरुन आता संदेशखळी हे राजकीय रणांगण बनले असून तीन दिवसांपासून भाजप आणि पोलिसांमध्ये चकमक सुरु आहे.

दरम्यान, संदेशखळीबाबत भाजप (BJP) खासदार लोकेट चॅटर्जी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या की, 'टीएमसीचे गुंड हिंदू महिलांना टार्गेट करतात आणि त्यांचा छळ करतात.' पत्रकार परिषदेला संबोधित करताना लोकेट म्हणाल्या की, ''देशात एकच महिला मुख्यमंत्री असून त्यांचेच राज्य महिलांसाठी सर्वात असुरक्षित आहे. 2011 मध्ये महिलांनीही ममता बॅनर्जींना मतदान केले होते. त्यावेळी, डाव्या सरकारमध्ये त्यांना असुरक्षित वाटत होते. परंतु ममता बॅनर्जी यांनी त्यांचा विश्वासही तोडलात.''

BJP MP Locket Chatterjee
Haldwani Violence: उत्तराखंडमध्ये का उसळला हिंसाचार, शूट अ‍ॅट साइटचे आदेश का देण्यात आले? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

त्या पुढे म्हणाल्या की, 'संदेशखळीमध्ये काय झाले हे संपूर्ण देशाला माहीत आहे. महिला मुख्यमंत्री असूनही राज्यात महिलांवर बलात्कार होतात पण त्या चकार शब्द काढत नाहीत. त्या पुढे असेही म्हणाल्या की, ''टीएमसीच्या गुंडांनी आधी महिलांवर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर त्यांची घरे लुटली. जेव्हा महिलांनी आवाज उठवला तेव्हा त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला.''

लोकेट चॅटर्जी पुढे म्हणाल्या की, 'ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आतापर्यंत यासंबंधी एकही वक्तव्य केलेले नाही. शहाजहान शेख अद्याप फरार आहे. पोलिसही त्याला पकडू शकत नाहीत.' ममता बॅनर्जींनी सांगितले की, आतापर्यंत एकही एफआयआर दाखल झालेला नाही. पोलीस प्रशासनही टीएमसीचे कार्यालय बनले आहे, त्यामुळे गुन्हाही दाखल होत नाही.'

BJP MP Locket Chatterjee
Manipur Violence: मणिपूरमध्ये पिता-पुत्रासह चौघांची गोळ्या झाडून हत्या, बिष्णुपूरमध्ये तणाव

चटर्जी पुढे म्हणाल्या की, सत्तेत असणाऱ्या लोकांना 30 टक्के मते हवी आहेत, म्हणूनच ते हिंदू महिलांची शिकार करत आहेत. अशा प्रकारचे अत्याचार आपण फक्त पाकिस्तानातच ऐकले आहेत. अशाच घटना आता पश्चिम बंगालमध्ये घडत आहेत पण ममता बॅनर्जी गप्प आहेत. दुसरीकडे, यामागे आरएसएसचा हात असल्याचे ममता सरकारचे म्हणणे आहे. याआधी बीरभूममध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com