Nuh Violence: 'मी कारगिल युद्ध लढलो अन् माझा मुलगा...', नूह हिंसाचाराचा बळी ठरलेल्या नीरजच्या वडिलांची वेदना

Haryana Violence: हरियाणाच्या मेवात-नूहमध्ये सोमवारी सुरू झालेल्या हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू झाला. तर 60 जण जखमी झाले आहेत. हिंसाचार दरम्यान, शेकडो वाहने हल्लेखोरांनी पेटवून दिली.
Haryana Violence
Haryana ViolenceDainik Gomantak

Soldier Who Fought Kargil War Lost Son in Haryana Violence:

हरियाणातील मेवात-नूह येथे सोमवारी झालेल्या हिंसाचारात दोन होमगार्डसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारात होमगार्ड नीरजलाही आपला जीव गमवावा लागला.

नीरजचे कुटुंब गढ़ी बाजीदपूर, गुरुग्राम येथे राहते. हे हिंदूबहुल गाव आहे, जिथे ५० मुस्लिम कुटुंबेही राहतात. नीरजच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांच्या गावातील लोक नेहमीच शांतता आणि सौहार्दाने एकत्र राहतात. अशा हिंसाचाराचा विचारही त्यांनी केला नव्हता.

नीरजचे संपूर्ण कुटुंब संरक्षण आणि होमगार्डच्या पार्श्वभूमीतून आले आहे. आज तकशी बोलताना नीरजचे वडील भावूक झाले. ते म्हणाले, मी देशाची सेवा केली, मी कारगिलमध्ये लढलो, माझा मुलगा कर्तव्य बजावताना शहीद झाला याचा मला अभिमान आहे.

नीरजचे वडील म्हणाले, "जे लोक जातीय तणाव निर्माण करतात ते चुकीचे आहेत, कोणताही धर्म असे म्हणत नाही. मी माझ्या नातवंडांनाही देशसेवेसाठी पाठवणार आहे."

दुसरीकडे, नीरजच्या पत्नीने सांगितले की, "मी सरकारला आवाहन करते की, दोन समुदायांमधील हा हिंसाचार थांबवा. कोणी माझ्यासारखी विधवा व्हावी आणि कुणाच्या मुलाने वडील गमावावेत अशी माझी इच्छा नाही.

या हिंसाचारात ठार झालेल्या चार नागरिकांमध्ये शक्तीचेही नाव आहे. शक्ती हा नूहपासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या भदास गावचा रहिवासी होता.

या गावात हिंदूंची लोकसंख्या फक्त २% आहे. मात्र आजपर्यंत येथे कधीही हिंसाचार किंवा गोंधळ झाला नाही.

शक्तीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शक्ती हा बडकल भागातील एका मिठाईच्या दुकानात काम करायचा. गवंडी म्हणूनही काम करायचा. बडकल भागातून हिंसाचार सुरू झाला तेव्हा शक्ती घरी आला होता.

हिंसाचारानंतर गावातील सर्व हिंदू कुटुंबे घाबरली, मग कळले की गावातील मोठ्या गुरुकुलावर दंगलखोरांनी हल्ला केला आहे. माहिती मिळताच शक्ती त्या बाजूला गेला, त्यानंतर तो घरी परतलाच नाहीत.

यानंतर त्याचा मृतदेह रस्त्यात सापडल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. शक्ती यांच्या डोक्यात जड वस्तूने मागून हल्ला करण्यात आला. 300-400 च्या जमावाने गुरुकुलावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

Haryana Violence
आरएसएस-इंदिरा गांधी संबंध, बांग्लादेश अन् अण्वस्त्र चाचण्या; नव्या पुस्तकातून खळबळजनक खुलासे

हरियाणाच्या नूहपासून सुरू झालेल्या हिंसाचाराची आग गुरुग्रामच्या पलवलपर्यंत पोहोचली. गुरुग्राममध्येही जमावाने अनेक दुकाने पेटवून दिली.

गुरुग्राममधील सेक्टर-66 मध्ये एका वृद्धाचे दुकान चोरट्यांनी पेटवून दिले. त्यांचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. त्यांनी सांगितले की त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती, परंतु कोणीही मदतीसाठी आले नाही, फक्त एक वाहन आग विझवण्यासाठी आले.

Haryana Violence
Train Shootout: "हे पाहून मला कसाब आठवला" जयपूर एक्सप्रेसमधील गोळीबारातील प्रत्यक्षदर्शी म्हणाला...

नूह येथील हिंदू संघटनांनी दरवर्षीप्रमाणे 31 जुलै रोजी बृजमंडल यात्रा काढण्याची घोषणा केली होती. त्याची परवानगीही प्रशासनाकडून घेण्यात आली होती.

सोमवारी ब्रिज मंडळाच्या यात्रेदरम्यान त्यावर दगडफेक करण्यात आली. काही वेळातच त्याचे दोन समुदायांमध्ये हिंसाचारात रूपांतर झाले. शेकडो गाड्या पेटवल्या. सायबर पोलिस स्टेशनवरही हल्ला झाला. गोळीबारही झाला.

याशिवाय एका मंदिरात शेकडो लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर लोकांना तेथून बाहेर काढण्यात आले. पोलिसांवरही हल्ले झाले. नुहानंतर सोहना येथेही दगडफेक आणि गोळीबार झाला. वाहने जाळण्यात आली. यानंतर हिंसाचाराची आग नुहपासून फरीदाबाद-गुरुग्रामपर्यंत पसरली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com