Ratan Tata: रतन टाटा यांच्या कुंडलीत असे कोणते योग होते, ज्याने ते इतके सफल उद्योगपती बनले!

Ratan Tata Kundli: रतन टाटा हे देशातील एक सफल उद्योजक होते. रतन टाटा यांना त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जात होते.
Ratan Tata Kundli
Ratan TataCanva
Published on
Updated on

Ratan Tata Kundli: रतन टाटा हे देशातील एक सफल उद्योजक होते. रतन टाटा यांना त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जात होते. बुधवारी (9 ऑक्टोबर 2024 रोजी) रात्री 11:30 वाजता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. टाटा यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, रतन टाटा यांनी त्यांच्या मुलाखतींमध्ये त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. टाटा यांनी त्यांच्या आयुष्यात खूप यश मिळवले. त्यांनी टाटा समूहाला नव्या उंचीवर पोहोचले. तर दुसरीकडे, आपल्या साध्या आणि प्रेमळ स्वभावाने त्यांनी प्रत्येक भारतीयांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले. पण एक गोष्ट नेहमी लोकांच्या मनात घर करुन राहिली ती म्हणजे, इतके यश मिळवूनही त्यांनी लग्न का केले नाही? सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या त्यांच्या कुंडलीत अनेक शुभ योग होते, ज्यामुळे ते एक यशस्वी उद्योगपती बनले. पण काही ग्रहांच्या संयोगामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही.

Ratan Tata Kundli
Ratan Tata: रतन टाटा यांना मिळाला 'या' देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार!

रतन टाटा यांची कुंडली

मिळालेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत सकाळी 06.30 वाजता झाला होता. त्यांची जन्मकुंडली धनु लग्न आणि तूळ रास होती. सूर्य, बुध आणि शुक्र स्थितीत अतिशय शुभ आहेत. बृहस्पति धन आणि मंगळ तिसऱ्या घरात आहे. चौथ्या घरात शनीची स्थिती, अकराव्या घरात चंद्र तर बाराव्या आणि सहाव्या घरात राहु-केतू हे चांगले समीकरण तयार करतात.

रतन टाटा यांच्या लग्न कुंडलीत बुधादित्य योग

ज्योतिषाचार्य अनिश व्यास यांच्या मते, रतन टाटा यांच्या जन्मकुंडलीत बुधादित्य योग होता. या योगाच्या व्यक्तीने जे काही काम हाती घेतले त्यात त्याला दुप्पट यश मिळते.

Ratan Tata Kundli
Ratan Tata: पेटीएमच्या संस्थापकाने रतन टाटांसाठी अशी काही पोस्ट केली, लोक संतापले, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

प्रेम असेल तर लग्नाची शक्यता का नाही?

ज्योतिषाचार्य अनिश व्यास यांनी स्पष्ट केले की, रतन टाटा यांच्या कुंडलीत, विवाहित जीवनाचा स्वामी बुध वर शनिची वक्रदृष्टी असल्यामुळे विवाहाची शक्यता नव्हती. कुंडलीच्या सातव्या भावातही सूर्याची दृष्टी होती. ग्रहांची अशी स्थिती ज्योतिषशास्त्रात वियोग किंवा विभक्त होण्यास कारणीभूत मानली जाते.

ग्रहांच्या अशा स्थितीत विवाह झाला तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने विवाह तुटतो किंवा घटस्फोटासारखी परिस्थिती निर्माण होते. नवमांश कुंडलीत सातव्या भावात शनीची प्रतिगामी बाजू आणि त्याच घरातील शुक्रावर मंगळ ग्रह असल्यामुळे रतन टाटा यांचे लग्न झाले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com