Rakesh Tikait
Rakesh TikaitDainik Gomantak

'MSP लागू करण्याचं दिलेलं वचन मोदी सरकारने तात्काळ पूर्ण करावं' :राकेश टिकैत

केंद्राने दिल्लीत दिलेले एमएसपीचे आश्वासन पूर्ण करावे, तसेच वर्षभराच्या आंदोलनादरम्यान नोंदवलेल्या शेतकऱ्यांवरील खटले देखील मागे घ्यावेत, असे वक्तव्य टिकैत यांनी केले आहे.
Published on

किमान आधारभूत किंमतीबाबत (MSP) शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन केंद्राने पूर्ण करावे, या मागणीसाठी शेतकरी आज ‘विरोध दिवस’ पाळणार आहेत, असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी सांगितले आहे. 31 जानेवारीला देशभरात विरुद्ध दिवस साजरा केला जाणार आहे. आमची मागणी आहे की केंद्राने दिल्लीत दिलेले एमएसपीचे आश्वासन पूर्ण करावे, तसेच वर्षभराच्या आंदोलनादरम्यान नोंदवलेल्या शेतकऱ्यांवरील खटले देखील मागे घ्यावेत, असे वक्तव्य टिकैत यांनी केले आहे.

Rakesh Tikait
WHO ने नकाशात जम्मू- काश्मीर 'पाकिस्ताचा' आणि अरुणाचल प्रदेश दाखवला 'चीनचा' भाग

या आंदोलनाचा आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांशी (Assembly Elections) कोणताही संबंध नाही, असेही ते त्यावेळी म्हणाले. आंदोलन हे निवडणुकीपेक्षा वेगळे असते, माझ्याकडे एक मत आहे आणि मी ते कोणालाही तरी टाकेन. मी कोणाचेही समर्थन करत नाहीये, जर लोक सरकारवर खूश असतील तर ते त्यांना मत देतील, जर ते नाराज असतील तर ते दुसर्‍या कोणाला तरी मत देतील, ते पुढे म्हणाले.

बीकेयूच्या नेत्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला पत्रकार परिषदेत संबोधित करताना केंद्राने त्यांच्या मागण्यांना प्रतिसाद न दिल्यास 31 जानेवारी रोजी ‘विरोध दिवस’ साजरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. आतापर्यंत, केंद्राने एमएसपीवर एकही समिती स्थापन केलेली नाही किंवा त्याबाबत आमच्याशी संपर्कही साधलेला नाही. लखीमपूर खेरी घटनेत ज्याचा मुलगा सामील आहे त्यांना सरकारने हटवले देखील नाही, असे बीकेयूचे नेते युधवीर सिंग म्हणाले आहेत.

Rakesh Tikait
पॉर्नसाईटवर प्रेयसीसोबतचे व्हिडिओ, तरुणाने गाठले पोलीस ठाणे

11 डिसेंबरला आमचे आंदोलन पुढे ढकलण्यात आले होते. सरकारने आमच्या मागण्यांना अद्याप प्रतिसाद दिलेला नाही, आम्ही 31 जानेवारी रोजी देशभरात सरकारचे पुतळे जाळणार आहोत, असेही ते यावेळी म्हणाले. केंद्र सरकारकडून MSP वर एक समिती स्थापन करण्याचे आणि त्यांच्यावरील खटले त्वरित मागे घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर संयुक्त किसान मोर्चा, आणि संयुक्त किसान मोर्चाने त्यांचा वर्षभराचा निषेध पुकारण्याची घोषणा केली होती.

सप्टेंबर 2020 मध्ये मंजूर झालेल्या तीन शेती कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर एक वर्षभर आंदोलन केले. 29 नोव्हेंबर रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या फार्म लॉज रिपील विधेयकाद्वारे कायदे रद्द केले गेले आणि नंतर राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची संमती मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com