पाकिस्तानचे पीएम खान यांनी भारताचे केले कौतुक, म्हणाले...

लाहोरमध्ये स्पेशल टेक्नॉलॉजी झोन ​​टेक्नोपोलिसचे उद्घाटन करताना त्यांनी ही माहिती दिली.
pakistan pm imran khan

pakistan pm imran khan

Dainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे कौतुक करत पाकिस्तान मागे राहिला असून भारताने प्रगती केली असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, भारताने 15 ते 20 वर्षांपूर्वीच या क्षेत्रात प्रवेश केला असला तरीही आयटी मार्केटमध्ये झपाट्याने प्रगती झाली आहे.

तर दुसरीकडे पाकिस्तान भारताच्या तुलनेत खूपच मागे आहे. लाहोरमध्ये स्पेशल टेक्नॉलॉजी झोन ​​टेक्नोपोलिसचे उद्घाटन करताना त्यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान (Prime Minister) इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तान आपल्या प्रादेशिक प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूप मागे पडला आहे.

<div class="paragraphs"><p>pakistan pm imran khan</p></div>
Delhi: कोरोना रुग्णांच्या संख्येने सहा महिन्यांचा मोडला रेकॉर्ड !

भारताचा (India) विशेष उल्लेख केला आणि सांगितले की भारताने आयटी क्षेत्रात लक्ष केंद्रित केले आणि वेगाने प्रगती केली. पाकिस्तान इतक्या महत्त्वाच्या क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रित करू शकत नाही, याचा परिणाम म्हणून आपण मागे राहिलो आणि जे देश पाकिस्तानच्या मागे होते तेही पुढे गेले.

इम्रान खान (Imran Khan) म्हणाले की, भारताची आयटी (IT) निर्यात 150 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे, तर पाकिस्तानची केवळ दोन अब्ज डॉलर्स आहे. निर्यात वाढविण्याकडे आपण लक्ष दिले नाही हे दुर्दैव आहे. 1960 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या (Economy) बाबतीत पाकिस्तानच्या स्थितीच्या तुलनेत आज आपण मागे आहोत. त्यावेळी जे देश आपल्या मागे होते ते देश पाकिस्तानच्या खूप पुढे गेले आहेत. पाकिस्तानसाठी (Pakistan) या क्षेत्रात अजून पुढे जाण्याची संधी आहे. आयटी क्षेत्राचा जलद विकास व्हावा यासाठी सरकार (Government) पावले उचलत आहे यावर आम्ही भर दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com