West Bengal: माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या हत्येचा पाकिस्तानने रचला कट

पश्चिम बंगालचे (West Bengal) माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांची हत्या करुन पाकिस्तानला संपूर्ण देशात अशांतता निर्माण करायची होती.
West Bengal Former Chief Minister Buddhadeb Bhattacharya
West Bengal Former Chief Minister Buddhadeb BhattacharyaDainik Gomantak

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (Buddhadeb Bhattacharya) यांची हत्या करुन पाकिस्तानला संपूर्ण देशात अशांतता निर्माण करायची होती. एकदा नव्हे, तर माजी मुख्यमंत्र्यांच्या हत्येचे चार वेळा प्रयत्न झाले. मात्र ते राज्याच्या गुप्तचर यंत्रणांनी उधळून लावले. माजी डीजी आणि माजी गुप्तचर प्रमुख दिलीप मित्रा (Dilip Mitra) यांनी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात हा दावा केला आहे. (Pakistan Plotted To Assassinate West Bengal Former Chief Minister Buddhadeb Bhattacharjee)

ते म्हणाले की, जंगलमहालमध्ये बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा कट राज्य प्रशासनाला आधीच कळला होता. त्यानंतरही हा हल्ला थांबवता आला नाही. राज्य पोलिसांच्या एका विभागाने दिलीप मित्रा यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. त्याचवेळी दिलीप मित्रा यांनी नंदीग्राम गोळीबार प्रकरणात बुद्धदेव भट्टाचार्यी यांना क्लीन चिट दिली आहे. बुद्धदेव भट्टाचार्य यांनी गोळीबाराचे आदेश दिले नसल्याचा दावा त्यांनी केला. राज्य पोलिसांच्या माजी महासंचालकांनी बुद्धदेवांच्या पक्षाच्या एका वर्गाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

West Bengal Former Chief Minister Buddhadeb Bhattacharya
मोदी सरकारच्या योजनांनी महिलांना बनवले स्वावलंबी

दरम्यान, दिलीप मित्रा यांनी राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून चार वर्षे काम केले. ते इंटेलिजन्स ब्युरोचेही प्रभारी होते. ऑपरेशन ब्लॅक स्टिलेटो हे पुस्तक त्यांनी नुकतेच प्रकाशित केले. माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या हत्येचा कट पाकिस्तानने रचल्याचा दावा दिलीप मित्रा यांनी केला आहे. देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. त्यांचा एकदा नव्हे तर सलग चार वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. राज्य पोलिसांनी प्रत्येक वेळी हा कट उधळून लावल्याचा दावा माजी गुप्तचर प्रमुखांनी केला.

बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यावर हल्ला झाला

तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य हे जिंदाल यांच्या स्टील प्लांटच्या पायाभरणीसाठी शालबनीला गेले होते. जंगलमहालमधील शालबनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2006 साली घडलेली घटना आहे. तेथून परतत असताना त्या दिवशी स्फोट झाला. ते शालबनीहून मेदिनीपूर शहरात परतत असताना माओवाद्यांनी भूसुरुंग स्फोटात त्यांच्या ताफ्याला लक्ष्य केले. मात्र या हल्ल्यात बुद्धदेव भट्टाचार्य थोडक्यात बचावले. राज्य पोलिसांनाही या घटनेची माहिती होती, असा दावा दिलीप मित्रा यांनी केला.

West Bengal Former Chief Minister Buddhadeb Bhattacharya
'देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हेच आपचे उद्दिष्ट'

बुद्धदेवांनी नंदीग्राममध्ये गोळ्या घालण्याचा आदेश दिला नाही

नंदीग्राम घटनेबाबत माजी डीजींनी दावा केला की, बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पोलिसांना (Police) गोळीबार करण्याची सूचना दिली नव्हती. मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि गृहसचिव यांना अंधारात ठेवून पोलिसांची कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. हल्दियामध्ये आयपीएस आणि सीपीएम नेत्याच्या सूचनेवरुन पोलिसांनी गोळीबार केल्याचा दावा त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पोलिसांना गोळी न घालण्याचा इशारा दिला होता. त्यांना नंदीग्रामची सॅटेलाइट इमेजही दाखवण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com