'अग्निवीरांच्या निवृत्तीचे वय 65 वर्षे करा', ममता बॅनर्जींनी मोदी सरकारकडे केली मागणी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला 'अग्निवीर'चे निवृत्तीचे वय 65 वर्षे करावे अशी मागणी केली आहे.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeDainik Gomantak
Published on
Updated on

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला 'अग्निवीर'चे निवृत्तीचे वय 65 वर्षे करावे अशी मागणी केली आहे. चार वर्षांत त्यांची सेवा संपुष्टात आल्यास तरुणांचे भवितव्य धोक्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, चार वर्षांनी हे सैनिक काय करतील? त्यांच्या भविष्याचे काय असणार?'

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) पुढे म्हणाल्या, रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करणे आपले ध्येय आहे. केंद्र सरकारने (Central Government) अग्निवीरांच्या निवृत्तीचे वय 65 वर्षे करावे'.

Mamata Banerjee
West Bengal Election:  ममता बॅनर्जीं विरुध्द सुवेंदू अधिकारी

दरम्यान, या योजनेंतर्गत 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना केवळ चार वर्षांसाठी सैन्य दलात भरती करण्यात येणार आहे. एकूण भरती झालेल्या तरुणांपैकी केवळ 25 टक्के तरुणांना 15 वर्षांहून अधिक काळ सशस्त्र दलात नियमितपणे नियुक्त केले जाईल. 2022 साठी भरतीसाठी उच्च वयोमर्यादा 23 वर्षे करण्यात आली आहे.

बॅनर्जी यांनी यापूर्वी दावा केला होता की, भाजप (BJP) या योजनेचा वापर आपला "सशस्त्र केडर बेस" तयार करण्यासाठी करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com