पाकचा ‘नापाक’ इरादा उद्‌ध्वस्त

Indian Army retaliates against ceasefire violation by Pakistan
Indian Army retaliates against ceasefire violation by Pakistan
Published on
Updated on

श्रीनगर : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती वाढलेल्या असताना आज भारतीय जवानांनी या कुरापतींना चोख उत्तर दिले. पाकिस्तानने आज उरी ते गुरेज विभागापर्यंत अनेक ठिकाणी नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. यात ४ जवानांसह १० जण मृत्युमुखी पडले. तसेच चार जवानांसह सहा नागरिक जखमी झाले. यावेळी भारताने जोरदार प्रत्युत्तर देत गोळीबार केला. त्यात पाकिस्तानचे ७ ते ८ सैनिक ठार झाले. पाकिस्तानच्या बाजूने मोठे नुकसान झाले असून अनेक खंदक आणि लाँचपॅड उद्‌ध्वस्त झाले. सीमेवरील पाकच्या काही चौक्याही नष्ट करण्यात आल्या आहेत. 

पाकिस्तानने आज प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील दावर, केरन, उरी आणि नौगांव या सेक्टरमध्ये बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात तीन जवान हुतात्मा झाले. हुतात्मा झालेल्यांत एका कॅप्टनचा समावेश आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com