आसाममध्ये पुराचा तडाखा, हवामान खात्याचा कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट जारी

त्रिपुरा, मिझोराम आणि मणिपूर या शेजारील राज्यांच्या काही भागांमध्ये परिस्थिती खराब
Assam Rain Updates:
Assam Rain Updates:Twitter

Assam Rain Updates: भारतीय हवामान खात्याने ईशान्येकडील राज्यांसाठी येलो अलर्ट नंतर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस आणि पुरामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. त्याच वेळी, त्रिपुरा, मिझोराम आणि मणिपूर या शेजारील राज्यांच्या काही भागांमध्ये परिस्थिती खराब आहे, ज्यामुळे हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. (North East Weather Update)

आसाम

आसाममधील पूरस्थिती गुरुवारी आणखीनच बिघडली आणि त्यात आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. राज्यातील 27 जिल्हे आणि येथे राहणाऱ्या सुमारे 7.18 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दैनिक पूर अहवालानुसार, नागाव जिल्ह्यातील कांपूर महसूल क्षेत्रात बुडून एकाचा मृत्यू झाला. याशिवाय कांपूरमध्ये आणखी दोन जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. यासोबतच राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या यंदा दहा झाली आहे, असे अहवालात म्हटले आहे. त्याचवेळी, परिस्थिती पाहता हवामान खात्याने 21 मे रोजी राज्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Assam Rain Updates:
Video: जम्मू-श्रीनगर महामार्गावर बोगद्याचा काही भाग कोसळला, 7 जण अडकले, बचावकार्य सुरू

मेघालय

हवामान खात्याने IMD मेघालयातही ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 21 मे पर्यंत हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. विभागानुसार राज्यात अतिवृष्टीची परिस्थिती असून त्यासाठी त्यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मेघालयातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये दररोज 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 16 अंशांपर्यंत तर कमाल तापमान 21 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाने हाहाकार माजवला आहे. राजधानी इटानगरमध्ये पावसामुळे आदल्या दिवशी भूस्खलनाच्या घटना घडल्या असून त्यात 4 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्याचवेळी आता हवामान खात्याने शनिवारपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 16 अंश आणि कमाल तापमान 21 अंश राहील.

Assam Rain Updates:
कलम 370 हटवल्यामुळे भारत-पाकचे संबंध बिघडले, पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेत व्यक्त केला संताप

मणिपूर

मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासह भूस्खलनामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राज्य सरकारने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की ते समस्यांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. त्याचवेळी हवामान खात्याने शनिवारपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे बेली पूल कोसळला, त्यामुळे इम्फाळ जिरीबाम महामार्ग तुटला आहे. हवामान खात्याने ईशान्येकडील त्रिपुरा, नागालँड आणि मिझोरामसाठी शनिवारपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com