"एक दिवसाचाही कोळसा नाही...": ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन

देशातील अनेक राज्यांमध्ये कोळशाचा तुटवडा (Coal Crisis) असल्याने वीज कपात केली जात आहे.
Energy Minister Satyendra Jain
Energy Minister Satyendra JainDainik Gomantak

देशातील अनेक राज्यांमध्ये कोळशाचा तुटवडा (Coal Crisis) असल्याने वीज कपात केली जात आहे. याबाबत दिल्लीचे ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra jain) म्हणाले की, ''संपूर्ण देशात कोळशाची तीव्र टंचाई आहे, बॅकअप नाही, त्यामुळे वीज साठवता येत नाही. आज फक्त 1 दिवसाचा कोळसा शिल्लक राहीला आहे, जे की 21 दिवस पुरेल एवढा साठा आवश्यक आहे. दिल्लीत आमचे कोणतेही पेमेंट बाकी नाही. केंद्र सरकारने कोळसा रॅक्स वाढवावे. समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे हे निश्चित करावे लागेल.''

ते म्हणाले की, ''संपूर्ण देशात कोळशाचा प्रचंड तुटवडा आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रेल्वे रॅक्सचे आहे. त्यांची उपलब्धता कमी आहे.''

Energy Minister Satyendra Jain
दिल्लीत उष्णतेची लाट, शिमल्यात मुसळधार पाऊस, जाणून घ्या हवामानाचा मूड

ते पुढे म्हणाले की, ''आमच्याकडे कोणताही बॅकअप नाही, वीज साठवता येत नाही. जर कोळशापासून वीज निर्माण केली जात असेल तर कोळशाचा बॅकअप असावा, जो सामान्य स्थितीत 21 दिवसांपेक्षा जास्त असणे आपेक्षित आहे. आज, बहुतेक प्लांटमध्ये 1 दिवसापेक्षा कमी कोळसा शिल्लक आहे. एनटीपीसी दादरी आणि एनटीपीसी उंचाहारमध्ये सुमारे 1 दिवसाचा कोळसा (Coal) शिल्लक आहे.'' दिल्लीचे ऊर्जामंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीचे कोणतेही पेमेंट बाकी नसल्याचे स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com