Justice UU Lalit: सिंधुदुर्गचा सुपूत्र होणार पुढचे सरन्यायाधीश, CJI रमणांनी केली शिफारस

पारंपारिकपणे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांच्या ज्येष्ठतेच्या आधारावर CJI म्हणून पदभार स्वीकारतात.
Chief Justice of India NV Ramana today recommends Justice UU Lalit's
Chief Justice of India NV Ramana today recommends Justice UU Lalit'sANI

Justice UU Lalit: न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांच्या नावाची शिफारस मान्य झाल्यास ते देशाचे 49 वे सरन्यायाधीश बनतील. सिंधुदूर्गमधील देवगड तालुक्यातल्या गिर्ये-कोठारवाडी हे त्यांचं मूळ गाव आहे. न्यायमूर्ती एनव्ही रमण हे 26 ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी CJI NV रमणा यांना पत्र लिहून त्यांच्या उत्तराधिकार्‍यांच्या नावाची शिफारस करण्याची विनंती केली होती. रिजिजू यांचे 3 ऑगस्ट रोजी लिहिलेले पत्र सायंकाळी उशिरा सरन्यायाधीशांच्या कार्यालयाला प्राप्त झाले.

परंपरेनुसार, त्यांच्या निवृत्तीच्या सुमारे एक महिना आधी, सरन्यायाधीश त्यांच्या उत्तराधिकारीची शिफारस सीलबंद कव्हरमध्ये कायदा आणि न्याय मंत्रालयामार्फत राष्ट्रपतींना पाठवतात. सहसा, सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशाचे नाव म्हणजे ज्येष्ठतेच्या क्रमाने क्रमांक दोनचे नाव लिफाफ्यात असते. पारंपारिकपणे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांच्या ज्येष्ठतेच्या आधारावर CJI म्हणून पदभार स्वीकारतात. सरन्यायाधीश म्हणून कोणताही निश्चित कार्यकाळ नाही. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय संविधानानुसार 65 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

Chief Justice of India NV Ramana today recommends Justice UU Lalit's
Nalanda Train Video: 440 व्हॉल्टची सेल्फी, सोळा वर्षांचा मुलगा रेल्वे बोगीवर चढला अन् जळून खाक झाला

4 महिन्यांत देशाला 3 CJI लाभणार

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात अनेक दशकांनंतर अशी संधी येणार आहे, जेव्हा चार महिन्यांत देशाला तीन सरन्यायाधीश लाभणार आहेत. सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या व्यतिरिक्त, न्यायमूर्ती उदय उमेश ललित आणि न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हे देखील या वर्षी जुलैपासून येत्या नोव्हेंबरमध्ये सरन्यायाधीश बनतील. या रंजक योगायोगानंतर पाच वर्षांनंतर 2027 मध्ये देशात असाच योगायोग पाहायला मिळणार आहे. 2027 मध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर या दोन महिन्यांत तीन सरन्यायाधीश येतील आणि जातील.

Chief Justice of India NV Ramana today recommends Justice UU Lalit's
UP: माफिया ब्रिजेश सिंगला मोठा दिलासा, मुख्तार अन्सारीच्या ताफ्यावर हल्ला केल्याप्रकरणी जामीन मंजूर

असा योगायोग 2017 मध्येही घडणला होता

सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्ड, परंपरा आणि प्रथेनुसार 27 सप्टेंबर 2027 रोजी न्यायमूर्ती विक्रम नाथ सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होणार असून देशाला पहिल्या महिला सरन्यायाधीश मिळणार आहेत. न्यायमूर्ती बीव्ही नागरथना हे 35 दिवस देशाचे सरन्यायाधीश असतील. यानंतर न्यायमूर्ती पीएस नरसिंह 31 ऑक्टोबर 2027 पासून सहा महिने आणि तीन दिवसांसाठी सरन्यायाधीश होतील.

हे 1950 मध्ये देखील घडले होते.

2027 पर्यंत इतक्या कमी वेळेत तीन सरन्यायाधीश होण्याची ही तिसरी वेळ असेल. सर्वोच्च न्यायालय 1950 मध्ये अस्तित्वात आले आणि त्यानंतर 1991 मध्ये नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान देशात तीन वेगवेगळे CJI करण्यात आले. त्यानंतर CJI रंगनाथ मिश्रा 24 नोव्हेंबर 1991 रोजी निवृत्त झाले. त्यानंतर न्यायमूर्ती कमल नारायण सिंह 25 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर असे एकूण 18 दिवस सरन्यायाधीश बनले. पुढे न्यायमूर्ती एमएच कानिया हे सरन्यायाधीश झाले आणि 13 डिसेंबर 1991 ते 17 नोव्हेंबर 1992, म्हणजे 11 महिने त्यांनी या सर्वोच्च पदाची जबाबदारी सांभाळली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com