Bihar Accident: बिहारमध्ये मोठा अपघात, भरधाव ट्रकने 30 जणांना चिरडलं

बिहारच्या वैशालीमध्ये भरधाव ट्रकने चिरडल्याने 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
Bihar Accident
Bihar AccidentDainik Gmantak

बिहारच्या वैशालीमध्ये भरधाव ट्रकने चिरडल्याने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री महनार हाजीपूर हायवेवर हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर जमावाने रागाच्या भरात ट्रक चालकाला बेदम मारहाणही केली. अपघातानंतर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासना घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या रुग्णवाहिकेतून मुलांचे मृतदेह आणि जखमी लोकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करून दिली.

दरम्यान, अपघातामध्ये (Accident) नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जणांचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या घटनेत आठ मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com