दिल्लीत आलेले 62000 परदेशी नागरिक 'बेपत्ता'; इमिग्रेशन विभागाने पोलिसांकडे सोपवली लिस्ट

Foreigner Missing: वेगवेगळ्या देशातून दिल्लीत आलेल्या 62 हजार 'बेपत्ता' परदेशी नागरिकांचा दिल्ली पोलिस शोध घेत आहे.
62000 Foreigner Missing After Coming To Delhi
62000 Foreigner Missing After Coming To DelhiDainik Gomantak

62000 Foreigner Missing After Coming To Delhi:

वेगवेगळ्या देशातून दिल्लीत आलेल्या 62 हजार 'बेपत्ता' परदेशी नागरिकांचा दिल्ली पोलिस शोध घेत आहे. भारतातील या परदेशी नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपली आहे, मात्र त्यांच्याबाबत सरकारकडे कोणतीही माहिती नाही. परराष्ट्र मंत्रालयाने पोलिसांना ही माहिती दिली आहे. त्याचवेळी गृहमंत्रालयाने दिल्ली पोलिसांना त्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत भारतात आलेले लाखो परदेशी नागरिक बेपत्ता आहेत. हे परदेशी नागरिक भारतात शिकण्यासाठी, उपचार घेण्यासाठी किंवा प्रवासासाठी आले होते, मात्र व्हिसाचा कालावधी संपल्याने त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती नाही. त्यांनी व्हिसाच्या मुदतवाढीसाठी अर्ज केला आहे की नाही याचीही स्पष्ट माहिती सरकारकडे नाही. यामध्ये नायजेरिया आणि अफगाणिस्तानमधील लोक मोठ्या संख्येने आहेत. इमिग्रेशन विभागाने अशा लोकांची यादी तयार करुन दिल्ली पोलिसांना सादर केली आहे.

माहिती देणाऱ्या सूत्रांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्रालयाने बेपत्ता परदेशी नागरिकांची सर्व माहिती डोंगलद्वारे पाठवली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या अतिरिक्त उपायुक्तांना हे डोंगल देण्यात आले आहे. ज्या परदेशी नागरिकांनी त्यांच्या भागातील पत्ते दिले आहेत त्यांचा शोध घेण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

62000 Foreigner Missing After Coming To Delhi
Delhi Police: लॉरेन्स बिश्नोई अन् गोल्डी ब्रार टोळीच्या तीन शार्प शूटर्सना अटक

गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशय

भारतात बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांचा गुन्ह्यात सहभाग असण्याची शक्यता पोलिसांना आहे. अनेकवेळा परदेशी नागरिक अमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात पकडले गेले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना पकडून परदेशात हद्दपार केल्यास गुन्हेगारीही कमी होईल.

नियम काय आहे

परदेशी नागरिकाला भारतात येण्यापूर्वी व्हिसा घ्यावा लागतो. जर तो जास्त वेळ घेत असेल तर तो व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी मुदतवाढीसाठी अर्ज करतो. एखाद्या व्यक्तीने व्हिसाच्या मुदतवाढीसाठी अर्ज केला असला तरी त्याला हद्दपार केले जात नाही.

62000 Foreigner Missing After Coming To Delhi
Delhi Excise Policy Case: केजरीवालांच्या अडचणीत वाढ, ईडीने बजावली नोटीस

विशेष शाखेला नोडल एजन्सी बनवली

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेला यासाठी नोडल एजन्सी बनवण्यात आली आहे. विशेष शाखेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याच्या पोलिसांना दिलेल्या पत्त्यावर जाऊन परदेशी नागरिकाची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर एखाद्या परदेशी नागरिकाने व्हिसाच्या मुदतवाढीसाठी अर्ज केला असेल तर त्याची माहिती विशेष शाखेला कळवण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर एखादा परदेशी नागरिक व्हिसा संपला असूनही तो बेकायदेशीरपणे राहत असल्याचे आढळून आल्यास त्याला हद्दपार करण्यात यावे. जिल्हा पोलीस ही सर्व माहिती विशेष शाखेला देतील जी गृहमंत्रालयाला पाठवेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com