India Vs Pakistan | World Cup Fever
India Vs Pakistan | World Cup FeverDainik Gomantak

World Cup 2023 Fever: भारत-पाकिस्तान सामन्यामुळे विमान भाडे गगनाला; गोवा-अहमदाबादसाठी मोजावे लागणार दहापट पैसे

India Vs Pakistan: सुरुवातीच्या आणि अंतिम सामन्यासाठी प्रेक्षकांमध्ये आकर्षण निर्माण झाले नसले तरी, भारत-पाकिस्तान सामन्याभोवती प्रचंड उत्साह आहे.
Published on

Goa to Ahmedabad flight ticket price hike: अहमदाबादला जाणार्‍या विमानांच्या तिकिटांमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. देशातील प्रमुख शहरांमधून अहमदाबादला जाण्यासाठी आता 350 टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.

15 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान यांच्यात विश्वचषक क्रिकेट सामना होणार आहे. त्यामुळे विमान प्रवासाला मोठी मागणी निर्माण झाली आहे.

क्रिकेट चाहते, व्हीआयपी लोक आणि प्रायोजकांनी हॉटेल आणि फ्लाइटचे बुकिंग आधीच करुन ठेवल्यामुळे, विमान प्रवास आणि हॉटेल भाड्याच्या किमती नवीन उच्चांकावर गेल्या आहेत.

गोवा-अहमदाबाद भाडे दहा पटींना वाढले

सध्या गोव्यातून अहमदाबादला जाण्यासाठी 3 ते 7 हजार भाडे आकारले जाते. मात्र, विश्वचषकादरम्यान भारत-पाकिस्तान सामन्याच्या दोन दिवस आधी आणि नंतर गोवा-अहमदाबाद विमान भाडे 6 हजार ते 31 हजार इतके आहे.

चेन्नई ते अहमदाबाद या रिटर्न ट्रिपमध्ये आता नॉन-स्टॉप फ्लाइटसाठी प्रति व्यक्ती 45,425 रुपये मोजावे लागतील.

१५ जुलैला म्हणजेच तीन महिने अगोदर तिकीट आरक्षित केले तरीही वाढीव भाडेच आकारले जात आहे. सामान्य परिस्थितीत या प्रवासासाठी सुमारे १०,००० रुपये खर्च येतो, असे प्रवासी उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले.

India Vs Pakistan | World Cup Fever
Novak Djokovic: 'आय लव्ह यू...', कुटुंबाकडे पाहताच जोकोविचला अश्रू अनावर, पाहा Video

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतात खेळवला जाईल. उद्घाटन सामना, अंतिम सामना आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

मोठी मागणी पाहता, 14-16 ऑक्टोबरसाठी प्रमुख भारतीय शहरांमधून अहमदाबादला जाणाऱ्या फ्लाइटच्या भाड्यात अनेक पटींनी वाढ झाली आहे.

दिल्ली आणि मुंबई ते अहमदाबादच्या फ्लाइटच्या भाड्यात अनुक्रमे २०३ टक्के आणि ३३९ टक्के वाढ झाली आहे.

फ्लाइट तिकिटांच्या किमती वाढल्याबद्दल बोलताना ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाचे (टीएएआय) अध्यक्ष वीरेंद्र शाह म्हणाले की, सामन्याच्या दिवसांत विमान प्रवासाला जास्त मागणी असल्याने ही वाढ करण्यात आली आहे.

"सुरुवातीच्या आणि अंतिम सामन्याच्या दिवसांमध्ये लक्षणीय आकर्षण निर्माण झाले नसले तरी, भारत-पाकिस्तान सामन्याभोवती प्रचंड उत्साह आहे."

India Vs Pakistan | World Cup Fever
Rahul Dravid: द्रविड अन् सपोर्ट स्टाफला आयर्लंड दौऱ्यात मिळणार सुट्टी, 'या' कारणामुळे BCCI चा मोठा निर्णय?

सामन्याच्या दिवशी प्रेक्षकांची होणारी गर्दी लक्षाक घेता, अहमदाबादमधील हॉटेल्सनी त्यांच्या भाड्यात आधीच आश्चर्यकारक वाढ केली आहे.

मोठ्या पंचतारांकित हॉटेल्सनी सामन्याच्या दिवसांसाठी आधीच त्यांच्या 60 टक्के खोल्या आणि सुट आरक्षित केल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे, हे सामने आतापासून जवळपास तीन महिन्यांनंतर ऑक्टोबरमध्ये होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com