रेल्वे बजेटमध्ये 15 ते 20 टक्के होऊ शकते वाढ

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी त्यांचा चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Railway
RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

2022 च्या रेल्वे अर्थसंकल्पात, या वर्षी लांब पल्ल्याच्या प्रवासाला आरामदायी बनवण्यावर आणि निवडणूक राज्ये आणि मेट्रो शहरे तसेच ईशान्येकडील भागांना रेल्वे नेटवर्कशी जोडण्यावर भर दिला जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी त्यांचा चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत, जो 2017 मध्ये रेल्वे अर्थसंकल्पाचे (Economic) केंद्रीय अर्थसंकल्पात विलीनीकरण झाल्यापासूनचा सहावा संयुक्त अर्थसंकल्प असेल. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार यावेळी रेल्वे (Railway) बजेटमध्ये वाढ करणार आहे. सरकार रेल्वेच्या बजेटमध्ये (Rail Budget 2022) 15 ते 20 टक्के वाढ करेल, अशी अपेक्षा आहे. (Union Budget 2022 Latest News)

रेल्वे बजेट सुमारे 2.5 लाख कोटी असू शकते

पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी सादर होणाऱ्या या रेल्वे अर्थसंकल्पात केंद्र सरकार सर्वसामान्य प्रवाशांशी संबंधित नवीन रेल्वे सुविधांची घोषणा करू शकते. गेल्या वर्षभरात रेल्वेला 26 हजार 338 कोटी रुपयांचा तोटा झाला असला, तरी गेल्या वर्षी केंद्र सरकारने रेल्वेसाठी विक्रमी 1,10,055 कोटी रुपयांची तरतूद केली होती. यावेळी रेल्वे बजेट सुमारे अडीच लाख कोटी रुपये अपेक्षित आहे. पुढील वर्षाच्या अखेरीस ब्रॉडगेज रेल्वे मार्गांचे संपूर्ण विद्युतीकरण साध्य करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र यावेळी रेल्वे बजेटमध्ये विक्रमी 7,000 किमी रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण प्रस्तावित करू शकते.

Railway
एअर इंडियानंतर टाटांच्या ताफ्यात 'या' कंपनीचा झाला समावेश!

नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान बुलेट ट्रेन!

देशवासीयही रेल्वे अर्थसंकल्पाची खूप वाट पाहतात, कारण देशाची जीवनवाहिनी म्हटल्या जाणार्‍या कनिष्ठ आणि मध्यमवर्गीयांच्या रेल्वेशी त्यांचे अतूट नाते आहे. यावेळच्या रेल्वे बजेटमध्ये हायस्पीड गाड्यांची घोषणा होण्याचीही शक्यता आहे. निवडणूक राज्ये आणि मेट्रो शहरांची रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी योजना आखल्या जात आहेत. यासाठी सरकार काही खासगी कंपन्यांना सहभागी करून घेऊ शकते. नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान बुलेट ट्रेनचीही घोषणा होऊ शकते.

रेल्वे प्रकल्पांसाठी बजेट

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या महिन्यात हवाई सर्वेक्षणाद्वारे मणिपूरमधील जिरीबाम-इम्फाळ नवीन लाईन प्रकल्पाचा आढावा घेतला. या प्रकल्पात देशातील सर्वात लांब बोगद्याचा समावेश आहे, जो गुवाहाटी आणि इंफाळला जोडेल. वैष्णव म्हणाले की, ईशान्येतील विविध रेल्वे प्रकल्पांसाठी यावर्षी 7000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com