Air India साठी टाटाची सर्वात मोठी बोली, कंपनीची मालकी पुन्हा टाटांकडे ?

दरम्यान अनेक कंपन्यांनी एअर इंडियाच्या (Air India) खरेदीमध्ये स्वारस्य दाखवले आहे. यामध्ये टाटा समूहाचे नाव आघाडीवर आहे. एअर इंडियाची सुरुवात 1932 मध्ये टाटा समूहानेच केली होती.
Tata Group bid high price For Air India
Tata Group bid high price For Air India Dainik Gomantak

एअर इंडियाच्या खाजगीकरणासाठी (Air India Privatization) स्थापन झालेल्या मंत्र्यांची समिती येत्या काही दिवसांत बैठक घेईल आणि एअर इंडियासाठी (Air India) लागलेल्या बोलीवर विचार करेल आणि मंजूर ती करेल. गृहमंत्रीअमित शहा (Amit Shah) यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांची ही समिती आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की, टाटा समूह (TATA Group) सर्वात जास्त बोली लावणाऱ्या म्हणून उदयास आला आहे. परंतु याबाबत अधिकृत घोषणा समितीच्या मान्यतेनंतरच केली जाणार आहे. (Tata Group bid high price For Air India)

अहवालानुसार, या प्रकरणाची माहिती असलेल्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की,एअर इंडियासाठीची बोली उघडण्यात आली आहे. आणि याबाबतचा शेवटचा निर्णय देखील झाला आहे, परंतु मंत्र्यांच्या समितीने त्याला मंजुरी दिल्यानंतरच त्याची घोषणा केली जाईल. ते पुढे म्हणाले की, समितीला सेलला मंजुरी देण्याचा अधिकार आहे आणि त्याला तांत्रिकदृष्ट्या मंजुरीसाठी कॅबिनेटकडे जाण्याची गरज भासणार नाही.

टाटा समूहाची बोली सरकारने निश्चित केलेल्या राखीव किंमतीपेक्षा सुमारे 3,000 कोटी रुपये अधिक असल्याचे अहवालात म्हटले आहे. सिंग यांनी केलेल्या बोलीपेक्षा टाटाची बोली सुमारे 5,000 कोटी अधिक असल्याचे सांगितले जाते. अहवालानुसार, सरकारी सूत्रांनी 15,000-20,000 कोटी रुपये राखीव किंमत ठेवलेल्या अहवालांवर टिप्पणी करण्यास नकार दिला आहे

Tata Group bid high price For Air India
LPG Cylinder चा पुन्हा भडका, सर्वसामान्यांचे वांदे

बुधवारी झालेल्या बैठकीत दोन्ही बोलीदारांना शेअर खरेदी करार (SPA) देण्यात आला. शाह यांच्या नेतृत्वाखालील समितीने विजेता निवडल्यानंतर निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू होईल, अधिकृत घोषणा झाल्यानंतर. या पॅनलमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा समावेश आहे.

दरम्यान अनेक कंपन्यांनी एअर इंडियाच्या खरेदीमध्ये स्वारस्य दाखवले आहे. यामध्ये टाटा समूहाचे नाव आघाडीवर आहे. एअर इंडियाची सुरुवात 1932 मध्ये टाटा समूहानेच केली होती. टाटा समूहाचे जे. आर.डी टाटा यांनी याची सुरुवात केली होती, ते स्वतः एक अतिशय कुशल पायलट देखील होते. आता टाटा समूहाने त्याच्या खरेदीसाठी आर्थिक निविदा सादर केल्यामुळे, एअर इंडिया टाटा समूहाकडे परत येते का हे पाहणे बाकी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com