Rahul Gandhi: पंतप्रधान मोदींना मणिपूर पेटवायचे आहे; राहुल यांच्या पत्रकार परिषदेतील 4 महत्त्वाचे मुद्दे

PM Narendra Modi: याला गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत उत्तर दिले. यामध्ये पतप्रधान मोदी यांनी मणिपूर हिंसाचाराबाबत एकही शब्द काढला नाही.
"PM Narendra Modi wants to set Manipur on fire"; Rahul Gandhi's attack
"PM Narendra Modi wants to set Manipur on fire"; Rahul Gandhi's attackDainik Gomantak

"PM Narendra Modi wants to set Manipur on fire"; Rahul Gandhi's attack:

गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या मणिपूरमधील हिंसाचारावरून विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला आहे.

याला गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत उत्तर दिले. यामध्ये पतप्रधान मोदी यांनी मणिपूर हिंसाचाराबाबत एकही शब्द काढला नाही.

यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूर पेटवायचे आहे. असे विधान केले.

राहुल यांच्या पत्रकार परिषदेतील 4 महत्त्वाचे मुद्दे

पंतप्रधानांना हे शोभत नाही

मणिपूर जळत आहे आणि पंतप्रधान हसत हसत बोलत होते, हे त्यांना शोभत नाही. भारतात कुठेतरी हिंसाचार होत असेल तर त्यांनी असे हसून बोलू नये.

19 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असे कधीच पाहिले नाही

मी जवळपास 19 वर्षे राजकारणात आहे. प्रत्येक राज्यात गेलो. पूर, त्सुनामी, हिंसाचार घडतो, आपण जातो. माझ्या 19 वर्षांच्या अनुभवात मी मणिपूरमध्ये जे पाहिलं ते मी इतरत्र कुठेही पाहिलं नाही.

"PM Narendra Modi wants to set Manipur on fire"; Rahul Gandhi's attack
"Whats App वर कंपनी विरोधात बोलणे गुन्हा नाही"; कर्मचाऱ्यांच्या अधिकाराला हायकोर्टाकडून संरक्षण

कुकी-मीतेई एकमेकांचे शत्रू

मणिपूरमध्ये मीतेई भागात गेल्यावर आम्हाला सांगण्यात आले की जर तुमच्या सुरक्षा पथकात कुकी लोक असतील तर आम्ही गोळीबार करू.

जेव्हा कुकीच्या भागात गेला तेव्हा त्यांनी सांगितले की जर मीतेई तुमच्या सुरक्षा पथकात असतील तर त्यांना मारले जाईल. मणिपूर दोन भागात विभागले गेले आहे.

पंतप्रधानांना मणिपूर जाळायचे आहे

आपल्या देशात काय चालले आहे, हे पंतप्रधानांना कळलेले दिसत नाही. ते तिकडे जाऊ शकत नसतील तर बोलायला पाहिजे. मणिपूरमध्ये जे काही चालले आहे ते लष्कर दोन दिवसांत थांबवू शकते. पंतप्रधानांना मणिपूर जाळायचे आहे, वाचवायचे नाही.

"PM Narendra Modi wants to set Manipur on fire"; Rahul Gandhi's attack
Manipur Violence: ती चिमुकल्यांना घेऊन पळत होती अन् नराधम...; सामुहिक बलात्काराचे आणखी एक हृदयद्रावक प्रकरण

20 जुलैपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. संपूर्ण अधिवेशनात विरोधकांनी मणिपूरमधील हिंसाचारावर गदारोळ केला.

ते पंतप्रधान मोदींना मणिपूरवर बोलण्याची मागणी करत होते. यासाठी विरोधकांनी 26 जुलै रोजी केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २७ जुलैला लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांचा प्रस्ताव मान्य केला.

दुसरीकडे, गुरुवारी (10 ऑगस्ट) पंतप्रधान मोदींनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर दिले. मोदींनी 2 तास 12 मिनिटांचे भाषण केले, त्यात 1 तास 32 मिनिटे बोलल्यानंतर मणिपूरवर भाष्य केले.

पंतप्रधान म्हणाले, मी सर्व देशवासियांना आश्वस्त करू इच्छितो की, जे प्रयत्न सुरू आहेत, त्यातून शांततेचा चेहरा नजीकच्या भविष्यात नक्कीच समोर येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com