PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांचे बल्ले-बल्ले, पीएम किसानच्या 14 व्या हप्त्यापूर्वी कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Narendra Singh Tomar: सरकारने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पीएम किसानचा शेवटचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणे अपेक्षित आहे.
Narendra Singh Tomar
Narendra Singh TomarDainik Gomantak

PM Kisan Samman Nidhi: देशभरातील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 14 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सरकारने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पीएम किसानचा शेवटचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणे अपेक्षित आहे.

मात्र या हप्त्याचे पैसे येण्यापूर्वीच केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, केंद्र आणि विविध राज्य सरकारे छोट्या शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान नेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या बळकट होण्यास मदत होईल.

मोठ्या शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान...

हैदराबाद (Hyderabad) येथे आयोजित एका कार्यक्रमात कृषिमंत्र्यांनी यावर भर दिला की, 'आज गरज आहे की आपण कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान कसे जोडता येईल.'

देशातील मोठ्या शेतकऱ्यांकडे तंत्रज्ञान आणि कृषी विज्ञान केंद्रांसह सर्व संसाधने उपलब्ध आहेत. ज्यांना तंत्रज्ञान उपलब्ध नाही, अशा छोट्या शेतकऱ्यांपर्यंत आणि इतरांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे.

Narendra Singh Tomar
PM Kisan: शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार 14 वा हप्ता? तारखेसंबंधी मोठा खुलासा

ते पुढे म्हणाले की, 'म्हणूनच शेतीचे डिजिटायझेशन कसे वाढवता येईल आणि डिजिटल उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचता येईल, या दिशेने केंद्र आणि राज्य सरकारे काम करत आहेत.'

11.50 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये पोहोचले

पीएम किसान योजना आणि सरकारी खरेदीचे उदाहरण देत तोमर म्हणाले की, या दोन योजनांवर यापूर्वी सर्व प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात होते.

PM-किसान योजनेचे 2.40 लाख कोटी रुपये 11.50 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत. आता देशात कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही.

Narendra Singh Tomar
PM Kisan: शेतकऱ्यांसाठी खूशखबर, मोदी सरकार देतेय 18 लाख रुपये; थेट खात्यात येणार पैसे!

तसेच, शेतकऱ्यांचा शेतमाल कोणतीही तक्रार न करता खरेदी केल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे पोहोचतात. ते पुढे म्हणाले की, 'शेतकऱ्यांना (Farmer) त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी, त्यांची पिके वाचवण्यासाठी आणि त्यांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकार या दिशेने पूर्ण गांभीर्याने काम करत आहेत.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com