पणजी: पर्यटन उद्योगासाठी लागणाऱ्या परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाणीपुरवठा आणि वीज खात्याच्या परवानग्यांना आता तीन वर्षांची वैधता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच मद्य परवाना कालावधी वाढवण्याचा विचारही सुरू असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्र्यांनी पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंत्रालयात बैठक घेतली. त्याला पर्यटनमंत्री रोहन खंवटे, राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू हेही उपस्थित होते. बैठकीत मांडण्यात आलेल्या समस्यांची दखल घेत त्या सोडवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणीही या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.