बेतोडा-निरंकाल पंचायत क्षेत्रातील ग्रामसभा आयआयटी व कचरा प्रकल्पाच्या मुद्यावरून तापली. ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत आयआयटी रद्द करण्याचा ठराव मंजूर केला. सरपंच मधू खांडेपारकर यांनी ग्रामस्थांची मागणी मान्य करून ‘या भागात आयआयटी किंवा कोणताही प्रकल्प नको’ असा ठराव हात उंचावून मंजूर केला.
सकाळपासूनच बेतोडा व कसमशेळ परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सभेत उपस्थित होते. सचिव आशीष नाईक यांनी मागील ग्रामसभेचा अहवाल सादर केला, त्यावेळी कचरा प्रकल्पाचा मुद्दा चर्चेत आला. मात्र, आयआयटीचा विषय समोर आल्यावर ग्रामसभा तापली. आयआयटीविरोधात विशेष ग्रामसभा बोलविण्याची मागणी ग्रामस्थांनी सातशे सह्यांसह पंचायतला सादर केली होती. ती न घेतल्याबद्दल सरपंचांना ग्रामस्थांनी जाब विचारला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.