Amitabh Bachchan| Social Media Dainik Gomantak
मनोरंजन

Amitabh Bachchan: बिग बींनी ट्विटरवर केली 'मोठी चूक' अन्...

अमिताभ बच्चन यांचे ट्विट चाहत्यांच्या नजरेस पडताच सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. बिग बी इंस्टाग्राम किंवा ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याची संधी सोडत नाहीत. यावेळी अमिताभ बच्चन ट्विट करत होते, मात्र यावेळी त्यांच्याकडून मोठी चूक झाली. आपली चूक लक्षात आल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांची माफीही मागितली, त्यानंतर काही लोक त्यांना मजेशीर उत्तर देत आहेत, तर काहींनी अभिनेत्याला ट्रोल केले आहे.

  • काय आहे संपूर्ण प्रकरण?

अमिताभ बच्चन त्यांच्या दमदार अभिनयासोबतच फनी स्टाइलसाठी ओळखले जातात. त्यांची सोशल मीडियावर खुप फॅन फॉलोअर्स आहे. यामुळेच अमिताभ बच्चन जेव्हा जेव्हा एखादी पोस्ट शेअर करतात तेव्हा ती खूप व्हायरल होते. पुन्हा एकदा त्यांचे एक ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चन यांचे ट्विट चाहत्यांच्या नजरेस पडताच सोशल मीडियावर (Social Media) कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. त्यांच्या या ट्विटवर टिप्पणी करताना एका यूजरने लिहिले की, 'सर स्पष्टीकरणासाठी धन्यवाद. ऑर्डर चुकीची असल्याने आणि त्यामुळे माझा ताळेबंद जुळत नसल्याने मी खूप नाराज झालो होतो, तर दुसऱ्याने लिहिले, 'अरे चांगले तुम्ही मला सांगितले होते सर, नाहीतर मला याचा विचार करून झोप येत नव्हती. दुसऱ्याने लिहिले, 'उद्या बाजार कोसळेल आता!' तर, ट्विटमध्ये 'APOLGIES !' या चुकीच्या स्पेलिंगमुळे काही लोक त्यांना ट्रोल करत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अमिताभ बच्चन लवकरच ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटात दिसणार आहेत. रामायणावर आधारित या चित्रपटात साऊथचे सुपरस्टार प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT