देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस Dainik Gomantak
महाराष्ट्र

Fandanvis Statement: बेळगाव, निपाणी, कारवार महाराष्ट्रात घेण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

Pramod Yadav

"बेळगाव, कारवार, निपाणीसह तिकडे असलेले गावं सर्वोच्च न्यायालयात लढून महाराष्ट्रात घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच, महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही." असे वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांनी केले आहे.

तीव्र पाणी टंचाईमुळे सांगलीच्या जत तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. या ठरावावर कर्नाटक सरकार गांभीर्यानं विचार करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज यांनी म्हटलं आहे. याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही, असे म्हटले आहे.

"महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह तिकडे असलेले गावं घेण्याचा आमचा प्रयत्न आहे," असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच, जतमधील गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव 2012 मधला असून, तो आता केलेला नाही. या गावांना पाणी देण्यासाठी म्हैसाळच्या सुधारित योजनेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT