देवेंद्र फडणवीस Dainik Gomantak
महाराष्ट्र

Fandanvis Statement: बेळगाव, निपाणी, कारवार महाराष्ट्रात घेण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

तीव्र पाणी टंचाईमुळे सांगलीच्या जत तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे.

Pramod Yadav

"बेळगाव, कारवार, निपाणीसह तिकडे असलेले गावं सर्वोच्च न्यायालयात लढून महाराष्ट्रात घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच, महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही." असे वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांनी केले आहे.

तीव्र पाणी टंचाईमुळे सांगलीच्या जत तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. या ठरावावर कर्नाटक सरकार गांभीर्यानं विचार करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज यांनी म्हटलं आहे. याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही, असे म्हटले आहे.

"महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह तिकडे असलेले गावं घेण्याचा आमचा प्रयत्न आहे," असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच, जतमधील गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव 2012 मधला असून, तो आता केलेला नाही. या गावांना पाणी देण्यासाठी म्हैसाळच्या सुधारित योजनेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT